मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये अजिंक्य राहणेचा पर्व आता संपुष्टात आले आहे. अजिंक्य राहणेने ३८ व्या वर्षी क्रिकेटच्या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आज ३० जुलै २०२६ रोजी त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत याची माहिती दिली.अजिंक्य रहाणेने आपल्या पोस्टमधून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI), सहकारी खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि जगभरातील चाहत्यांचे मनापासून आभार मानले. मागील तीन वर्षांपासून भारतीय संघातून वगळल्यानंतर, राहणेने देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर संघात पुनरागमनाचा प्रयत्न केला, परंतु त्याला वारंवार अपयश आले. त्याने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना जुलै २०२३ मध्ये खेळला होता. या काळात त्याने आयपीएलमध्ये सातत्याने धावा केल्या आणि कोलकात नाईट रायडर्स संघाचे नेतृत्वही केले.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील अत्यंत शांत, संयमी आणि कठीण काळात संघाचा 'संकटमोचक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) ...
अजिंक्य राहणेची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी
अजिंक्य राहणेने भारतासाठी आतापर्यंत ८५ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ३८ च्या सरासरीने ५०७७ धावा केल्या आहेत. त्याने आपल्या कसोटी करियरमध्ये १२ शतक आणि २६ अर्धशतकही केले आहेत. यात लॉर्ड्स, मेलबर्न आणि वेलिंग्टनसारख्या ऐतिहासिक मैदानांवरील शतकांचा समावेश आहे. त्याने आपला शेवटचा एकदिवसीय सामना २०१८ मध्ये आणि शेवटचा टी-२० सामना २०१६ मध्ये खेळला होता. (Ajinkya Rahane )
View this post on Instagram
कर्णधार म्हणून अविस्मरणीय कामगिरी
अजिंक्य राहणेने धरमशाल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी कर्णधार म्हणून पदार्पण केले आणि आठ विकेट्सने सामना जिंकत २-१ ने मालिका जिंकली . त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका जिंकली होती. त्या मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर , नियमित कर्णधार विराट कोहली भारतात परतला होता. त्यावेळी अजिंक्य राहणेला कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यावेळी अनेक भारतीय खेळाडू दुखारपतग्रस्त झाल्यामुळे, संघाला नेट गोलंदाजांनाही संधी द्यावी लागली होती. अश्या कठीण परिस्थितीतही अजिंक्य राहणेच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने २-१ मालिका जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली . (Ajinkya Rahane )
View this post on Instagram
अजिंक्य राहणे हा भारतीय क्रिकेट इतिहासातील एकमेव कर्णधार आहे, ज्याने पाचपेक्षा जास्त कसोटी सामन्यांत संघाचे नेतृत्व केले आणि एकही सामना गमावला नाही. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने सहा कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी चार सामने जिंकले आणि दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.





