Ram Kulkarni : 'नेरळकर कुटुंबाची बदनामी केल्याचा आरोप'; हर्षवर्धन सपकाळ, नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी

मुंबई : बारावीतील विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत करण्यात आलेल्या आरोपांवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी (BJP State Spokesperson Ram Kulkarni) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस नेते तथा आमदार नाना पटोले आणि पक्षाचे प्रवक्ते बालाजी गाडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्याविरोधात बालकांच्या मानसिक छळासंदर्भातील कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.


राम कुलकर्णी (Ram Kulkarni) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित काँग्रेस नेत्यांनी दिवसभर माध्यमांसमोर कथितपणे चुकीची माहिती देत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. मात्र, या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या दरम्यान नांदेड येथील नेरळकर कुटुंब आणि त्यांच्या मुलांची सार्वजनिक बदनामी झाली असून, त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला.



कुलकर्णी (Ram Kulkarni) यांनी दावा केला की, नेरळकर कुटुंबातील विद्यार्थ्यांनी बारावीच्या शिक्षणासोबतच स्पर्धात्मक परीक्षांसाठी कठोर परिश्रम घेत CAT परीक्षेत 99 पर्सेंटाइल गुण मिळवले आहेत. अशा गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला.


"राजकीय आरोप करताना एका विद्यार्थ्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे नाव सार्वजनिकरीत्या घेत बदनामी करण्यात आली. अशा प्रकारामुळे संबंधित विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बालकांच्या मानसिक छळासंदर्भातील कायद्यांनुसार संबंधित नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा," अशी मागणी राम कुलकर्णी (Ram Kulkarni) यांनी केली.



तसेच, नेरळकर कुटुंबीयांची जाहीर माफी मागावी, अशीही मागणी त्यांनी काँग्रेस नेत्यांकडे केली आहे. "राजकीय मतभेद असू शकतात, मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांना लक्ष्य करणे योग्य नाही," असेही कुलकर्णी (Ram Kulkarni) यांनी म्हटले.


दरम्यान, या आरोपांवर काँग्रेसकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणावर संबंधित नेते काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




Comments
Add Comment

Manoj Jarange : मनोज जरांगेंकडून २९ ऑगस्टला आझाद मैदानात आंदोलनासाठी पत्र

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून पुन्हा आंदोलनाची हाक दिली असून, त्यासाठी मुंबईतील

BSNL 5G Launch : BSNL ५जी कधी लाँच होणार ? सिम बदलावे लागणार की सॉफ्टवेअर अपग्रेड ? जाणून घ्या सर्व उत्तरे!

सरकारी टेलिकॉम कंपनी 'भारत संचार निगम लिमिटेड' (BSNL) आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी ५जी (5G) सेवा सुरू करण्याच्या

Nashik : नांदूर मध्यमेश्वरच्या शाश्वत विकासासाठी ‘इको-टुरिझम आणि संवर्धन विकास आराखडा’

Nashik : राज्यातील पहिले रामसर क्षेत्र आणि ‘महाराष्ट्राचे भरतपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर

National Sports Awards : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा, १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार, विजेत्यांमध्ये अनेक दिग्गज खेळाडू

नवी दिल्ली : केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ च्या विजेत्यांची

Nashik Crime News : नाशिक - मालेगावात ‘सर्च ऑपरेशन’, एक लॅपटॉप आणि चार मोबाईल जप्त

Nashik Crime News : नाशिक शहर व मालेगाव परिसरात आक्षेपार्ह साहित्य ठेवल्याची गुप्त माहिती दहशतवादी विरोधी पथक व गाेपनीय

Pandharpur Rehabilitation Policy Approved : श्री क्षेत्र पंढरपूर पुनर्वसन धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी

- ३ हजार ९९३ कोटी ९० लाख रुपयांच्या विकासकामांना गती मिळणार मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या