मुंबई : बारावीतील विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत करण्यात आलेल्या आरोपांवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी (BJP State Spokesperson Ram Kulkarni) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस नेते तथा आमदार नाना पटोले आणि पक्षाचे प्रवक्ते बालाजी गाडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्याविरोधात बालकांच्या मानसिक छळासंदर्भातील कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
राम कुलकर्णी (Ram Kulkarni) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित काँग्रेस नेत्यांनी दिवसभर माध्यमांसमोर कथितपणे चुकीची माहिती देत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. मात्र, या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या दरम्यान नांदेड येथील नेरळकर कुटुंब आणि त्यांच्या मुलांची सार्वजनिक बदनामी झाली असून, त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला.
मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांनी पूर्व उपनगरातील मानखुर्द आणि गोवंडी परिसरातील स्वच्छतेविषयक कामांची आज सकाळी ...
कुलकर्णी (Ram Kulkarni) यांनी दावा केला की, नेरळकर कुटुंबातील विद्यार्थ्यांनी बारावीच्या शिक्षणासोबतच स्पर्धात्मक परीक्षांसाठी कठोर परिश्रम घेत CAT परीक्षेत 99 पर्सेंटाइल गुण मिळवले आहेत. अशा गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला.
"राजकीय आरोप करताना एका विद्यार्थ्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे नाव सार्वजनिकरीत्या घेत बदनामी करण्यात आली. अशा प्रकारामुळे संबंधित विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बालकांच्या मानसिक छळासंदर्भातील कायद्यांनुसार संबंधित नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा," अशी मागणी राम कुलकर्णी (Ram Kulkarni) यांनी केली.
- सुनील तटकरे यांच्या दिल्ली दौऱ्याने वाढल्या नव्या चर्चांना उधाण नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींचे संकेत मिळत ...
तसेच, नेरळकर कुटुंबीयांची जाहीर माफी मागावी, अशीही मागणी त्यांनी काँग्रेस नेत्यांकडे केली आहे. "राजकीय मतभेद असू शकतात, मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांना लक्ष्य करणे योग्य नाही," असेही कुलकर्णी (Ram Kulkarni) यांनी म्हटले.