Pandharpur Flood : पंढरीत पुराचा विळखा! चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली

पंढरपूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने भीमा-चंद्रभागा नदीला पूर आला आहे. मंगळवारी (२८ जुलै) उजनी धरणातून सोडलेले पाणी पंढरपुरात दाखल होताच चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली. नदीची पातळी झपाट्याने वाढल्याने पंढरपूरातील ऐतिहासिक जुना दगडी पूल आणि तालुक्यातील नदीवरील आठही बंधारे पाण्याखाली गेले आहेत.(pandharpur)



उजनी धरणातून सुमारे ६१ हजार क्युसेक (cusec), तर वीर धरणातून (Veer Dam) जवळपास ५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. या वाढलेल्या प्रवाहामुळे भीमा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून नदीकाठच्या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
दरम्यान, चंद्रभागा नदीच्या पात्रातील अनेक लहान मंदिरांना पाण्याचा वेढा पडला असून सर्व घाटांपर्यंत पाणी पोहोचले आहे. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने नदीपात्रात जाण्यास बंदी घातली आहे. सर्व प्रमुख घाटांवर बॅरिकेड्स उभारण्यात आले असून नागरिकांना नदीपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


पूराचा फटका वाहतुकीलाही बसला आहे. नदीवरील सर्व आठ बंधारे पाण्याखाली गेल्याने त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. शहरातील अंबाबाई पटांगण, व्यास नारायण परिसरातील झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.पटवर्धन कुरोली परिसरातही पुराचा मोठा परिणाम दिसून आला आहे. पिराची कुरोली येथील बंधाऱ्यावर पाणी आल्याने पटवर्धन कुरोली गावाचा संपर्क तुटला आहे. मंगळवारी दुपारपासून बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानंतर पोलिसांनी तत्काळ वाहतूक बंद केली. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, आणखी पाणीपातळी वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Manoj Jarange : मनोज जरांगेंकडून २९ ऑगस्टला आझाद मैदानात आंदोलनासाठी पत्र

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून पुन्हा आंदोलनाची हाक दिली असून, त्यासाठी मुंबईतील

BSNL 5G Launch : BSNL ५जी कधी लाँच होणार ? सिम बदलावे लागणार की सॉफ्टवेअर अपग्रेड ? जाणून घ्या सर्व उत्तरे!

सरकारी टेलिकॉम कंपनी 'भारत संचार निगम लिमिटेड' (BSNL) आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी ५जी (5G) सेवा सुरू करण्याच्या

Nashik : नांदूर मध्यमेश्वरच्या शाश्वत विकासासाठी ‘इको-टुरिझम आणि संवर्धन विकास आराखडा’

Nashik : राज्यातील पहिले रामसर क्षेत्र आणि ‘महाराष्ट्राचे भरतपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर

National Sports Awards : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा, १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार, विजेत्यांमध्ये अनेक दिग्गज खेळाडू

नवी दिल्ली : केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ च्या विजेत्यांची

Nashik Crime News : नाशिक - मालेगावात ‘सर्च ऑपरेशन’, एक लॅपटॉप आणि चार मोबाईल जप्त

Nashik Crime News : नाशिक शहर व मालेगाव परिसरात आक्षेपार्ह साहित्य ठेवल्याची गुप्त माहिती दहशतवादी विरोधी पथक व गाेपनीय

Pandharpur Rehabilitation Policy Approved : श्री क्षेत्र पंढरपूर पुनर्वसन धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी

- ३ हजार ९९३ कोटी ९० लाख रुपयांच्या विकासकामांना गती मिळणार मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या