Sugar Stock Rules : साखरसाठ्यावर केंद्राचे निर्बंध; ३० दिवसांपेक्षा अधिकचा साठा ठेवण्यास मनाई; कमाल मर्यादा ४,००० क्विंटल

नवी दिल्ली: अपुऱ्या पावसाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर देशात साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि सणासुदीच्या काळात संभाव्य तुटवडा टाळण्यासाठी केंद्र सरकारने साखर व्यापाऱ्यांवर नवीन निर्बंध लागू केले आहेत. १ ऑगस्टपासून देशातील कोणत्याही साखर व्यापाऱ्याला साखरेचा साठा ३० दिवसांपेक्षा अधिक काळ ठेवता येणार नाही. तसेच, कोणत्याही ठिकाणी एकावेळी ४,००० क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा ठेवण्यासही बंदी घालण्यात आली आहे. हे निर्बंध ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत लागू राहतील. (Sugar Stock Rules)



अन्न व ग्राहक व्यवहार मंत्रालयाने मंगळवारी राजपत्रात यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली. अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ आणि साखर (नियंत्रण) आदेश, २०२५ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. साखर व्यापाऱ्यांनी आपल्या साठ्याची माहिती सरकारच्या ऑनलाइन पोर्टलवर जाहीर करून ती नियमित अद्ययावत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. साठा किती दिवस ठेवला आहे, याची गणना करताना साखर प्राप्त झाल्याचा दिवसही ग्राह्य धरण्यात येणार आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) अंतर्गत रास्त भाव दुकानांमार्फत वितरणासाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या वतीने साठविण्यात आलेल्या साखरेला या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे. तसेच, राज्य सरकारने नियुक्त केलेल्या व्यापाऱ्यांनाही ही सूट लागू असेल. ( Central Government)



साखरेचे उत्पादन वाढण्याचा अंदाज


‘इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ने (आयएसएमए) २०२५-२६ हंगामात इथेनॉल निर्मितीसाठी वळविलेली साखर वजा जाता देशात २९.३ दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. मागील हंगामात हे उत्पादन २६.१२ दशलक्ष टन होते.

Comments
Add Comment

Maratha Reservation : मराठा समाजासाठी महायुती सरकारएवढे निर्णय कोणीही घेतले नाहीत!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कुणाला न्याय मिळत नसल्याची भावना असेल, तर संवादातून मार्ग काढू मुंबई : "मराठा

Nitesh Rane : सागरमाला २.० अंतर्गत महाराष्ट्रातील प्रकल्पांना मंजुरी मिळण्यासाठी मंत्री नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा

राज्यातील बंदर विकासाला गती देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्राधान्याने मंजुरीची मागणी केंद्रीय बंदरे,

Minister Babasaheb Patil : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या उर्वरित याद्या लवकरच जाहीर होणार

पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करावे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे

ADR Report : १४ मुख्यमंत्र्यांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद; डी. के. शिवकुमार सर्वात श्रीमंत, तर भजनलाल यांच्याकडे सर्वात कमी संपत्ती

नवी दिल्ली  : 'एसोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' (ADR) ने देशातील ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या

Prasad Oak : चित्रपती व्ही. शांताराम व राज कपूर जीवनगौरव तसेच विशेष योगदान पुरस्कार जाहीर

मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे २०२५ चे 'चित्रपती व्ही. शांताराम

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयकडून आरोपपत्र दाखल, आतापर्यंत १३ आरोपींना अटक

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात एक मोठे पाऊल उचलले असून, राऊस ॲव्हेन्यू