Union Minister Jitendra Singh : परीक्षा सुधारणा विधेयक भारतीय संसदेच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरेल - केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह

नवी दिल्ली : लोकसभेत सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांच्या प्रतिबंधासाठी) सुधारणा विधेयक, २०२६ वर चर्चा सुरू झाली असून, या वेळी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक देशातील विद्यार्थी आणि तरुणांच्या हिताचे संरक्षण करणारे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, या सुधारणा विधेयकामुळे सरकारची विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत असलेली कटिबद्धता पुन्हा अधोरेखित होते. (Union Minister Jitendra Singh)



जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, काल सादर करण्यात आलेले हे विधेयक प्रत्यक्षात सार्वजनिक परीक्षा अनुचित साधन प्रतिबंध कायदा, २०२४ मधील सुधारणा आहे. हा कायदा देखील याच सरकारने आणला होता. स्वतंत्र भारताच्या इतिहासात सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी अशा प्रकारचा कायदा प्रथमच करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्रीय मंत्री म्हणाले की, पूर्वीचा कायदा आणि सध्याची सुधारणा ही देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सरकारच्या दृढ इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, देशातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणालाही खेळ करू दिला जाणार नाही.जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक भारतीय संसदेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणारा कायदा असल्याचे म्हटले. त्यांनी विविध परीक्षांमध्ये झालेल्या पेपरफुटी आणि गैरप्रकारांच्या घटनांचा उल्लेख करत अशा प्रकारच्या समस्या रोखण्यासाठी कठोर कायद्याची गरज असल्याचे सांगितले. चर्चेदरम्यान त्यांनी विरोधकांवरही टीका केली. सिंह म्हणाले, "मोदीजींचे कौतुक केले पाहिजे. जे अपूर्ण काम तुम्ही पूर्ण करायला हवे होते, ते सरकारने पूर्ण केले आहे."



दरम्यान, मंगळवार, २८ जुलै रोजी लोकसभेचे कामकाज विरोधकांच्या गोंधळामुळे काही काळासाठी स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर दुपारी २ वाजता पुन्हा कामकाज सुरू झाले. दिल्लीसह देशभरातील आंदोलनांदरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईच्या मुद्द्यावर विरोधक सरकारकडून उत्तराची मागणी करत होते.परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता वाढवणे, पेपरफुटीसारख्या घटनांना आळा घालणे आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे हे विधेयक आगामी काळात देशातील परीक्षा व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.(Union Minister Jitendra Singh)

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : 'मराठी भक्तीची भाषा, अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला'

ठाणे : मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही

Sonia Gandhi : 'वंदे मातरम्' प्रकरणात सोनिया गांधी आणि खर्गेंच्या विरोधात मुंबईत दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR

मुंबई : स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्' गायन सुरू असताना त्यात व्यत्यय

Noel Tata : नोएल टाटा यांनी घेतली अमित शहा आणि पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्याची भेट

नवी दिल्ली : एन. चंद्रशेखरन यांनी २०२७ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या घेतलेल्या

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

Drugs on Station : रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या कूलरमध्ये नशेची इंजेक्शन

कल्याण : चोरी, नशेखोरांचा उपद्रव आणि विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत आलेले कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक