PUC Certificate Validity : वाहनधारकांना मोठा दिलासा ! PUC सर्टिफिकेटची वैधता ३ वर्षांपर्यंत वाढवण्याचा सरकारचा प्रस्ताव

नवी दिल्ली : वाहनांमुळे होणारे हवेचे प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी दरवर्षी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) घेण्याचे बंधन आतापर्यंत वाहनांवर होते. पण आता या नियमात बदल करण्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय विचार करत आहे. यामुळे प्रदूषण कसे नियंत्रणात राहणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. पण दरवर्षी PUC करणाऱ्या वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.



नव्या BS-6 वाहनांसाठी PUC प्रमाणपत्राची वैधता सध्याच्या एका वर्षाऐवजी तब्बल तीन वर्षे करण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयात विचाराधीन आहे. हा नियम अमलात आल्यास नव्याने नोंदणी झालेल्या BS-6 वाहनांना पहिल्या नोंदणीच्या तारखेपासून सहा वर्षांपर्यंत दर तीन वर्षांनी PUC तपासणी करावी लागेल. त्यानंतर वाहन सहा ते दहा वर्षे जुने झाल्यास दर दोन वर्षांनी PUC नूतनीकरण बंधनकारक असेल. मात्र, १० वर्षांहून अधिक जुन्या BS-6 वाहनांसाठी दर सहा महिन्यांनी PUC तपासणी करावी लागणार आहे. याशिवाय, BS-4 वाहनांसाठी दर सहा महिन्यांनी PUC प्रमाणपत्र नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. तर BS-1, BS-2 आणि BS-3 वाहनधारकांना प्रत्येकी तीन महिन्यांनी PUC तपासणी करावी लागणार आहे. वाहनाचे वय आणि त्याचे उत्सर्जन मानक लक्षात घेऊन हे नियम लागू करण्याचा सरकारचा उद्देश आहे.


BS (Bharat Stage) उत्सर्जन मानके ही वाहनांमधून होणारे कार्बन मोनोऑक्साइड(carbon monoxide), नायट्रोजन ऑक्साइड(nytrogen oxide), हायड्रोकार्बन(hydrocarbon) आणि पार्टिक्युलेट मॅटर यांसारख्या प्रदूषकांचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी लागू करण्यात आली आहेत. भारताने एप्रिल २०२० पासून थेट BS-6 मानके लागू केली असून, BS-5 टप्पा वगळण्यात आला होता. BS-6 वाहनांमुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी होते आणि त्यासाठी कमी सल्फरयुक्त इंधनाचा वापर केला जातो. याबाबतच्या अंतिम अधिसूचना जारी करून नव्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Comments
Add Comment

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी

National Teacher Award 2026 : उच्च शिक्षण - तंत्रनिकेतन क्षेत्रातील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर, महाराष्ट्रातील तीन प्राध्यापकांचा समावेश

नवी दिल्ली : देशभरातील उच्च शिक्षण आणि तंत्रनिकेतन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २१