रत्नागिरी : मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे काम १०० टक्के पूर्ण करणारा रत्नागिरी जिल्ह्यातील ‘२६५ – चिपळूण’ हा राज्यातील पहिला मतदारसंघ बनला आहे. चिपळूणचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी आकाश लिगाडे यांनी याबद्दलची माहिती दिली. अहोरात्र काम करणारे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ यांचा या यशात सिंहाचा वाटा असल्याची प्रतिक्रिया लिगाडे यांनी व्यक्त केली आहे. याआधी १०० टक्के पुनरिक्षण पूर्ण करणारे राज्यातील पहिले गाव बनण्याचा मान चिपळूण तालुक्यातल्याच मौजे टेरव बुद्रुक या गावाने पटकावला होता.(Ratnagiri)
मुंबई : राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागांतर्गत ...
चिपळूण विधानसभा मतदारसंघात चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील ३३६ मतदान केंद्रांचा समावेश असून, मतदारसंख्या दोन लाख ७१ हजार ४३३ आहे. त्यात एक लाख ३८ हजार ६७५ स्त्रिया, तर एक लाख ३२ हजार ७५८ पुरुषांचा समावेश आहे. विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेत ९०.४० टक्के गणना प्रपत्रांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. ९.५६ टक्के गणना प्रपत्रे जमा करण्यासारखी नव्हती (अनकलेक्टेबल). तसेच, मॅपिंग होऊ न शकल्याचे प्रमाण २.७९ टक्के एवढे आहे. आता आठ ऑगस्टपर्यंतच्या उर्वरित कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या पातळीवर फेरपडताळणी आणि मॅपिंगचा प्रयत्न केला जाणार आहे.
नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील देशातील एक अग्रेसर आणि महत्त्वाची बँक असलेल्या 'बँक ऑफ बडोदा'चा (Bank of Baroda)तब्बल १ टीबी इतका प्रचंड आणि संवेदनशील डेटा ...
डिजिटायझेशन झालेल्या गणना प्रपत्रांची तपासणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवर केली जाणार आहे. सहायक आणि अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांपासून त्यांना साह्य करणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून हे काम १०० टक्के पूर्ण करता आले, असे आकाश लिगाडे यांनी सांगितले.






