मुंबई : ऑगस्टचा पंधरवडा संपत आला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत असून काही भागांत जोरदार सरी कोसळत आहेत, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होत आहे. त्यामुळे चांगल्या पावसाची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांसह नागरिकांचेही लक्ष आता पुढील काही दिवसांच्या हवामानाकडे लागले आहे. (Maharashtra Rain)
कोकणातील काही भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडू शकतो. दुसरीकडे पालघर, ठाणे, मुंबई आणि सिंधुदुर्ग या भागांसाठी सध्या कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. (Weather Update)
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांसह घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असून पुढील काळातही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. (Monsoon)
Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या
नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला असून, पुढील काही दिवसांत मुसळधार ...
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात यलो अलर्ट कायम आहे. या भागात काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर पावसाचा जोर कमी होऊ शकतो. काही ठिकाणी ढगाळ वातावरणासोबत उन्हाचे दर्शनही होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. या भागासाठी जोरदार पावसाचा इशारा नसल्याने शेतकऱ्यांना आणखी काही दिवस चांगल्या पावसाची वाट पाहावी लागू शकते. (Rain Forecast)
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांतही सध्या मोठ्या पावसाचा अंदाज नाही. अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि वाशिममध्ये हवामान ढगाळ ते कोरडे राहण्याची शक्यता आहे. काही भागांत उन्हाची तीव्रताही जाणवू शकते. (Rain Update)
एकूणच, 17 ऑगस्ट रोजी कोकण आणि घाटमाथ्यावरील काही भाग वगळता राज्यात जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. ऑगस्टचा मध्य उलटूनही सर्वदूर समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता पुढील पावसाकडे लागले आहे. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.