मुंबई : भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत आपले वर्चस्व कायम राखत दुसऱ्या सामन्यात तब्बल ९० धावांनी शानदार विजय मिळवला. हरारे येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजीत भारताने २० षटकांत ५ बाद २१९ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ १७.५ षटकांत अवघ्या १२९ धावांत गारद झाला. या विजयासह भारताने मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेत मालिका खिशात घातली. (IND vs ZIM T20 2nd Match)
ईशान-तिलकची तुफानी फटकेबाजी :
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात सावध झाली. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ईशान किशनने ४४ चेंडूत ८१ धावांची झंझावाती खेळी साकारत डावाला वेग दिला. त्याने अर्धशतकासह झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. त्याला तिलक वर्माने २९ चेंडूत नाबाद ६० धावांची स्फोटक साथ दिली. कर्णधार श्रेयस अय्यरने २५, तर युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने अवघ्या ९ चेंडूत २० धावा करत भारताची धावसंख्या २१९ पर्यंत पोहोचवली. (IND vs ZIM T20 2nd Match)
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा आयसीसी पुरुष टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानावर झेंडा फडकावला आहे. इंग्लंडविरुद्धच्या नुकत्याच ...
गोलंदाजांचाही कहर; झिम्बाब्वेचा डाव कोसळला :
२२० धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची फलंदाजी भारतीय गोलंदाजांसमोर पूर्णपणे निष्प्रभ ठरली. ब्रायन बेनेटने सर्वाधिक झुंज देत काही काळ प्रतिकार केला, तर तडिवानाशे मारुमानी (२४), रायन बर्ल (२०) आणि ब्रॅड इव्हान्स (१९) यांनी थोडाफार संघर्ष केला. मात्र, इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. भारताकडून अभिषेक शर्माने ३ बळी घेत सर्वाधिक प्रभावी कामगिरी केली. त्याच्यासोबत यश ठाकूर आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स, तर रवी बिश्नोई, शिवम दुबे आणि तिलक वर्मा यांनी प्रत्येकी १ बळी घेत झिम्बाब्वेचा डाव १२९ धावांत संपवला. (IND vs ZIM T20 2nd Match)
झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना प्रत्येकी एकच विकेट :
झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुजाराबानी, रिचर्ड अंगारावा, ब्रॅड इव्हान्स, न्यामहुरी आणि ब्रायन बेनेट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. मात्र, कर्णधार सिकंदर रझा यांना एकही विकेट मिळवता आली नाही. (IND vs ZIM T20 2nd Match)
मुंबई : गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असताना कोकण (Konkan) गाठणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. मध्य रेल्वे (Central Railway) आणि ...
भारताची मालिका खिशात :
सलग दुसरा विजय मिळवत भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. फलंदाज आणि गोलंदाज या दोन्ही विभागांत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत झिम्बाब्वेला एकतर्फी पराभवाचा धक्का दिला. आता तिसरा सामना जिंकून मालिका ३-० ने खिशात घालण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. (IND vs ZIM T20 2nd Match)