Devendra Fadnavis : मी राज्यात समाधानी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर भाष्य; संत तुकारामांच्या अभंगाचा संदर्भ देत या चर्चांना पूर्णविराम



मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळेल, असे दावे विरोधकांकडून सातत्याने केले जात आहेत. त्यावर भाष्य करताना, मी महाराष्ट्रात समाधानी आहे, असे फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले. आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.(Devendra Fadnavis)



दिल्लीत जाण्याच्या सर्व चर्चा फेटाळून लावताना मुख्यमंत्र्यांनी ‘तुका म्हणे उगे रहावे, जे जे होईल ते पहावे, चित्त असू द्यावे समाधानी’ या ओळींचा संदर्भ दिला. “माझे चित्त पूर्णपणे समाधानी आहे. पांडुरंगाच्या आशीर्वादाने मला सहा वेळा आषाढी आणि दोन वेळा कार्तिकी एकादशीला पूजा करण्याचे भाग्य लाभले. राज्याच्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून ही संधी मिळणे हा विठूरायाचाच प्रसाद आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.


राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या स्थितीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कर्जमाफी किंवा हमीभाव पुरेसा नसून उत्पादन खर्च कमी करणे हाच खरा उपाय आहे. शेतमालाचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ठरवत असल्याने आणि उत्पादन खर्च सातत्याने वाढत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. मोफत वीज, सूक्ष्म सिंचन, सौरपंप आणि कृषी यंत्रसामग्रीवर ९० ते १०० टक्के अनुदान दिले जात आहे. तसेच ‘महाविस्तार’ सारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता (Ai) तंत्रज्ञानाचा वापर करून आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देऊन उत्पादन खर्च २५ टक्क्यांनी कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.(Pandharpur)




पंढरपूर कॉरिडॉरचे काम लवकरच सुरू होणार



- पंढरपूर तीर्थक्षेत्र कॉरिडॉर प्रकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ८० ते ९० टक्के स्थानिक नागरिकांच्या शंका निरसन करण्यात आले आहे. उर्वरित नागरिकांशी संवाद साधून सर्वांना विश्वासात घेऊनच काम पुढे नेले जाईल. या प्रकल्पाचे महत्त्वाचे काम पुढील दोन ते अडीच वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन असून यामुळे विस्थापित होणाऱ्यांना योग्य पुनर्वसन करून प्रस्थापित केले जाईल, असा विश्वास त्यांनी दिला.
- दरम्यान, ठाकरे बंधूंच्या मोर्चावर बोलताना फडणवीस म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, ठाकरे बंधूंकडून काढल्या जाणाऱ्या मोर्चाचा विद्यार्थ्यांच्या हितसंबंधांशी काहीही संबंध नसून, आपल्या राजकीय पुनरागमनासाठीच हा आटापिटा सुरू असल्याचे दिसते.
- दिल्लीतील आंदोलनाबाबत बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, शांततेच्या मार्गाने मागण्या मांडणाऱ्या आंदोलकांचा आणि अराजकता माजवू पाहणाऱ्या राजकीय घटकांचा वेगळा विचार केला पाहिजे. केंद्र सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्याने आणि सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेत शांततेचे आवाहन केल्याने परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Comments
Add Comment

Maharashtra News : राज्यातील निम्म्याहून अधिक धरणे भरली

५३.३८ टक्के पाणीसाठा; मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम मुंबई : राज्यातील विविध

Mumbai Environment : तरंगता कचरा रोखण्यासाठी मालाडमध्ये 'द ओशन क्लीनअप' इंटरसेप्टर पायलट प्रकल्प कार्यान्वित

तरंगता कचरा संकलन प्रकल्प पाहणीसाठी तेजिंदर सिंग तिवाना उतरले नदीपात्रात! मुंबई : मालाड खाडीमध्ये जागतिक

MUMBAI-PUNE WATER LEVEL : मुंबई आणि पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली; दोन्ही शहरांच्या धरणांमध्ये जोरदार जलसाठा जमा!

मुंबई: महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः मुंबई व पुणेकरांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी समोर आली आहे. यावर्षी

BHARAT TAXI : मुंबई आणि पुणेकरांसाठी 'भारत टॅक्सी' सेवा सुरू; ट्रॅफिक असो किंवा पाऊस, भाडे राहणार निश्चित!

मुंबई: कॅब चालकांची भाडे नाकारण्याची कटकट, पीक अवर्समधील अव्वाच्या सव्वा दर आणि ट्रॅफिक किंवा पावसात होणारी

Mumbai Rain : मुंबईत वर्षभराच्या तुलनेत सरासरी ७६ टक्के पडला पाऊस

मुंबई : मुंबईत (Mumbai) आतापर्यंत वर्षभराच्या तुलनेत सरासरी ७५ ते ७६ टक्के एवढ्या पावसाची (Rain) नोंद झाल्याची आकडेवारी

BMC Schools : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत ८० टक्के शालेय साहित्याचे वाटप

मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) शाळांमध्ये (Schools) शालेय विद्यार्थ्यांना (Students) दरवर्षी २७ शैक्षणिक वस्तुंचे मोफत वाटप