Mumbai-Pune Water Update : मुंबई-पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! धरणांत मुबलक जलसाठा; पाहा कोणत्या तलावात किती टक्के पाणी ?

मुंबई : यंदाच्या मान्सूनने सुरुवातीला हुलकावणी दिली असली, तरी जुलै महिन्यात मुंबई (Mumbai) आणि पुण्याच्या पाणलोट क्षेत्रात कोसळलेल्या धुवाधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात विक्रमी वाढ झाली आहे. संततधार पावसामुळे दोन्ही प्रमुख शहरांना वर्षभर पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांची पातळी झपाट्याने उंचावली असून, गेल्या वर्षीच्या साठ्याची बरोबरी साधली आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबई आणि पुणेकरांवर असणारे पाणीकपातीचे संकट टळले असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.



पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये २४.१५ टीएमसी पाणी जमा; खडकवासला १००% पूर्ण


पुणे आणि लगतच्या धरण क्षेत्रात गेल्या ४८ तासांत झालेल्या जोरदार पावसामुळे खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. सध्या या प्रकल्पातील चारही धरणांमध्ये मिळून एकूण २४.१५ टीएमसी म्हणजेच तब्बल ८२.८६ टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा २३.९८ टीएमसी (८२.२७%) इतका होता.



पुण्यातील प्रमुख धरणांमधील सद्यस्थिती


खडकवासला : १००% (पूर्ण क्षमतेने भरले)


पानशेत : ८७.३२%


वरसगाव : ८१.८६%


टेमघर : ६५.२४%



मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये ८३.६८% साठा


दुसरीकडे, मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) जल अभियंता विभागाने जारी केलेल्या ताज्या अहवालानुसार, मुंबईला दैनंदिन पाणीपुरवठा करणाऱ्या सातही प्रमुख तलावांमध्ये सध्या १२,११,१८८ दशलक्ष लिटर (८३.६८%) उपयुक्त जलसाठा जमा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या सततच्या पावसामुळे मुंबईच्या पाण्याच्या चिंतेतून दिलासा मिळाला आहे.



मुंबईतील प्रमुख तलावांमधील पाणीसाठा 


मोडक सागर : १००% (ओव्हरफ्लो)


विहार : १००% (ओव्हरफ्लो)


तुळशी : १००% (ओव्हरफ्लो)


तानसा : ९८.४५%


भातसा : ८२.६८%


मिडल वैतरणा : ८०.७३%



हवामान खात्याकडून आणखी पावसाचा अंदाज


मुंबई आणि पुणे या दोन्ही मेट्रो शहरांमधील धरणांत वर्षभराची पाण्याची गरज भागवणारा साठा निर्माण झाल्यामुळे दोन्ही महापालिकांकडून लागू केली जाणारी संभाव्य पाणीकपात आता टळली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळे उर्वरित धरणे आणि तलावदेखील लवकरच १०० टक्के भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात

Wardha Accident : ट्रॅव्हल्स बसमुळे चिरडून वर्ध्यात तीन मुलींचा जागीच मृत्यू

वर्धा : देशभर स्वातंत्रदिनाचा उत्साह असताना वर्ध्याच्या हिंगणघाट शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मेडिकल

Jalgaon Crime : जळगावात दूध विक्रेत्यांवर ‘एफडीए’चा बडगा, ७ जणांवर कारवाई

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यात दुधाची मागणी वाढत असताना अनधिकृत विक्री आणि भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध

FDA Raid : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट 'एफडीए'च्या रडारवर

- १४ आस्थापनांचे परवाने निलंबित; 'फिल्म सिटी'तील बॉलीवूड कॅफेलाही दंड मुंबई : झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी

Eknath Shinde : ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

विकसित भारताच्या निर्मितीत महाराष्ट्र अग्रस्थानी, ठाणे जिल्ह्याच्या विकासाला मिळणार नवी गती ठाणे : ८० व्या