Nashik : भोंदूबाबा अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड ; ईडीच्या तक्रारीत...

Nashik : नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. स्वतःला आध्यात्मिक सल्लागार आणि ज्योतिषी म्हणून सादर करणाऱ्या अशोक खरातकडे ज्योतिषशास्त्र किंवा अंकशास्त्राचे कोणतेही औपचारिक शिक्षण, प्रशिक्षण किंवा मान्यताप्राप्त प्रमाणपत्रच नसल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने आपल्या अभियोग तक्रारीत केला आहे. तरीही तब्बल दोन दशकांहून अधिक काळ त्याने प्रभावशाली व्यक्तींमध्ये आपली प्रतिमा निर्माण करून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. (Ashok Kharat News)



अंकशास्त्राचे कोणतेही औपचारिक शिक्षण नाही


अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी सुरू असतानाच ईडीच्या अभियोग तक्रारीत अनेक गंभीर दावे करण्यात आले आहेत.उत्पन्नाच्या तुलनेत प्रचंड संपत्ती जमा केल्याच्या आरोपांची चौकशी करताना ईडीने अशोक खरातची सखोल चौकशी केली. या चौकशीत खरातने स्वतः कबूल केल्याचा दावा ईडीने केला आहे की, त्याने कधीही ज्योतिषशास्त्र किंवा अंकशास्त्राचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नव्हते. तसेच कोणतेही अधिकृत प्रशिक्षण किंवा मान्यताप्राप्त प्रमाणपत्रही त्याच्याकडे नव्हते. (Ashok Kharat News)



कुटुंबीयांच्या नावावर मालमत्ता खरेदी


असे असतानाही अशोक खरातने स्वतःची प्रतिमा एक प्रभावी आध्यात्मिक सल्लागार, भविष्यवेत्ता आणि धार्मिक विधी करणारा व्यक्ती म्हणून निर्माण केली. त्याच्या भविष्यवाण्या, धार्मिक विधी आणि तथाकथित आध्यात्मिक मार्गदर्शनामुळे अनेक उद्योगपती, व्यावसायिक, राजकारणी आणि इतर प्रभावशाली व्यक्ती त्याच्याकडे आकर्षित झाल्याचा दावा ईडीने केला आहे. याच प्रभावाचा वापर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा आरोपही तपास यंत्रणेने केला आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान अशोक खरातने स्वतःच्या उत्पन्नातून कुटुंबीयांच्या नावावर अनेक स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे मान्य केले.तपासादरम्यान नऊ मालमत्तांच्या खरेदीची माहिती समोर आली. (Ashok Kharat News)



प्रकरणाला आणखी गंभीर वळण


दरम्यान, या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून ईडीने केलेले सर्व आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध व्हायचे आहेत. त्यामुळे या तक्रारीतील दावे हे तपास यंत्रणेचे आरोप असून, त्यावर अंतिम निर्णय न्यायालयाकडून दिला जाणार अशोक खरात प्रकरणात दिवसागणिक नवे खुलासे समोर येत असून आता ईडीच्या तक्रारीमुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळालं आहे. पुढील न्यायालयीन सुनावणीत या आरोपांबाबत काय निष्कर्ष निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Marleshwar Temple : मार्लेश्वर मंदिरात तोकड्या व असभ्य कपड्यांमध्ये प्रवेशास बंदी

मार्लेश्वर देवस्थानचे पवित्र्य राखण्यासाठी देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय देवरूख : राज्यातील लाखो भाविकांचे

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला