IND vs ZIM : पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा विजय, मयंक यादवच्या वेगासमोर झिम्बाब्वे ढेर!

वेगवान गोलंदाज मयंक यादवची (Mayank Yadav) भेदक गोलंदाजी आणि सलामीवीर वैभव सूर्यवंशीच्या (Vaibhav Sooryavanshi) अवघ्या १८ चेंडूंतील तुफानी अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या टी-२० (T-20) सामन्यात झिम्बाब्वेचा ७ गडी राखून धुव्वा उडवला. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.


सामन्यात नाणेफेक (Toss) जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला. वेगवान गोलंदाज मयंक यादवने आपल्या ४ षटकांत अवघ्या १८ धावा देत २ महत्त्वाचे बळी टिपले. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला 'सामनावीर' म्हणून गौरवण्यात आले. त्याला प्रिन्स यादवने (२/१९) उत्तम साथ दिली. शिवम दुबे आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. झिम्बाब्वेकडून वेस्ली मधेवेरेने सर्वाधिक ३९ धावा केल्या, तर रायन बर्लने २६ धावांचे योगदान दिले. भारताच्या अचूक गोलंदाजीमुळे झिम्बाब्वेला २० षटकांत ७ बाद १२५ धावांवरच रोखता आले. या सामन्यातून भारताच्या अशोक शर्माने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पण केले.



१२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. अभिषेक शर्मा अवघ्या १ धावेवर बाद झाला. मात्र, त्यानंतर आलेल्या वैभव सूर्यवंशीने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची पिसे काढली. वैभवने अवघ्या १८ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने आपले झंझावाती अर्धशतक पूर्ण केले. तो ५० धावांवर बाद झाला, पण तोपर्यंत त्याने भारताचा विजय सुकर केला होता. क्रिकइन्फोने त्याला सामन्यातील 'मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर' म्हणून घोषित केले.
वैभव बाद झाल्यानंतर इशान किशनने २४ चेंडूंत ३५ धावांची उपयुक्त खेळी केली. कर्णधार श्रेयस अय्यरने संयमी फलंदाजी करत २४ चेंडूंत नाबाद २८ धावा केल्या, तर तिलक वर्माने नाबाद ६ धावा करत भारताला १३.२ षटकांत ३ बाद १२६ धावांवर पोहोचवून विजय मिळवून दिला.भारताने तब्बल ४० चेंडू राखून हा सामना सहज खिशात घातला. झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुझाराबानीने २ बळी घेतले, तर रिचर्ड नगारावाला १ बळी मिळाला.

Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील