Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम! राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ९५ टक्क्यांहून अधिक पाऊस

- पालघरमध्ये एका दिवसात तब्बल १८३ मिमी पावसाची नोंद


मुंबई : राज्यात मान्सून (Maharashtra Monsoon Update) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने जाहीर केलेल्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार आज (२३ जुलै) नाशिक घाट, पालघर, पुणे घाट आणि घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट, तर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड आणि सातारा घाटासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत अतिवृष्टी, विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि जोरदार वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Monsoon Update)



हवामान विभागाच्या अंदाजानुसार सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यक नसल्यास घाटमाथा आणि नदीकाठच्या भागात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Maharashtra Monsoon Update)


दरम्यान, राज्यातील पावसाची आकडेवारीही समाधानकारक आहे. २३ जुलैपर्यंत महाराष्ट्रात सरासरी ४२९ मिमी पावसाची नोंद झाली असून ती सरासरीच्या ९४.६८ टक्के इतकी आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये 'लार्ज एक्सेस' म्हणजेच सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. (Maharashtra Monsoon Update)



यामध्ये रायगडमध्ये १,८६०.४ मिमी, पालघरमध्ये १,६९९.७ मिमी, रत्नागिरीत १,६५७.४ मिमी आणि ठाण्यात १,५३५.९ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. एका दिवसात सर्वाधिक १८३ मिमी पाऊस पालघर जिल्ह्यात, तर ९५ मिमी पाऊस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. हवामान विभागाने पुढील २४ ते ४८ तास नागरिकांनी सतर्क राहण्याचा सल्ला दिला असून, मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे तसेच घाट परिसरात दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगितले आहे. (Maharashtra Monsoon Update)

Comments
Add Comment

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी