NITESH RANE : 'नीट'च्या आंदोलनात 'सर तन से जुदा'चे नारे कशासाठी; मंत्री नितेश राणे यांचा सवाल

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हिंदू राष्ट्रविरोधी शक्तींची घुसखोरी



मुंबई : "राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेशी (नीट) संबंधित आंदोलनात विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा देशविरोधी अजेंडाच अधिक चालवला जात आहे. मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवून 'सर तन से जुदा'चे नारे देणे, हिंदू देवी-देवतांचा अवमान करणे आणि पोलिसांवर चिखलफेक करण्याचे काम सुरू आहे. हे कृत्य करणारे सामान्य विद्यार्थी असूच शकत नाहीत," असे मत मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात हिंदू राष्ट्रविरोधी शक्तींची घुसखोरी झाली असून, आंदोलनाची आणि देशातील तरुणाईची बदनामी करण्याचा एककलमी कार्यक्रम राबवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.



कणकवली येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले, "परीक्षेच्या रचनेत सुधारणा झाल्या पाहिजेत यावर कोणाचेही दुमत नाही. केंद्र सरकार आणि संबंधित मंत्री या विषयावर अत्यंत सकारात्मक असून त्या दृष्टीने ठोस पावले उचलली जात आहेत. यंदा जवळपास ११ लाख विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. असे असताना आंदोलनाच्या नावाखाली 'सर तन से जुदा'च्या घोषणा देणे, 'सीता का पती' असा उल्लेख करून हिंदू धर्माची मानहानी करणे आणि पोलिसांना व सैन्याला शिवीगाळ करण्याचे काम कोण करत आहे?" असा सवाल त्यांनी केला. जर हिंमत असेल, तर अन्य धर्मीयांच्या बाबत असा उल्लेख करून दाखवावा," असे आव्हानही त्यांनी दिले.



काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून सुरू असलेल्या टीकेला उत्तर देताना मंत्री राणे म्हणाले की, "काँग्रेसच्या कार्यकाळात अनेकदा परीक्षांचे पेपर फुटले होते, तेंव्हा त्यांनी किती शिक्षणमंत्र्यांचे आणि पंतप्रधानांचे राजीनामे घेतले? स्वतःच्या कार्यकाळात कोणतीही कारवाई न करणारे आज भारतीय जनता पक्षावर आणि पंतप्रधानांवर टीका करत आहेत. केंद्रातील मोदी सरकार किमान या व्यवस्थेत सुधारणा करण्याची मानसिकता तरी दाखवत आहे. मात्र, या आंदोलनाआडून विरोधक देशाच्या विरोधात असलेल्या प्रत्येक शक्तीला खतपाणी घालण्याचे काम करत आहेत", असा आरोपही त्यांनी केला.



राहुल गांधींनी राजकीय उंचीप्रमाणे मोदींबद्दल बोलावे



  • राहुल गांधींच्या तोंडी देशहिताच्या आणि तरुणांच्या हिताच्या गोष्टी अजिबात शोभत नाहीत. म्हणूनच देशातील जनतेने त्यांना व त्यांच्या काँग्रेस पक्षाला घरी बसवले असून, त्यांना वारंवार पराभवाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी स्वतःच्या राजकीय उंचीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलावे, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

  • अशा आंदोलनांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर कोणी देशाच्या विरोधात भूमिका घेत असेल किंवा देवी-देवतांचा अपमान करत असेल, तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तसेच विरोधी पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला जनतेने पूर्णपणे नाकारले असून, देशवासीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, असा दावा त्यांनी केला.

Comments
Add Comment

Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम! राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ९५ टक्क्यांहून अधिक पाऊस

- पालघरमध्ये एका दिवसात तब्बल १८३ मिमी पावसाची नोंद मुंबई : राज्यात मान्सून (Maharashtra Monsoon Update) पुन्हा सक्रिय झाला असून

Heart-wrenching incident in Nagpur : शाळेत मधल्या सुट्टीत धावताना अचानक कोसळल्याने ८ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

नागपूर: नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी शाळेत अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावणारी घटना

Nashik : नाशिकच्या 'या' भाजप आमदाराचं WhatsApp हॅक, थेट...

Nashik : नाशिकमधील एका भाजप आमदाराचं WhatsApp हॅक झाल्याची घटना घडली आहे. तुमची शॉपिंग डिलिव्हरी आली आहे. तुमचा पत्ता

Mumbai Local : गर्दीचा मनस्ताप संपणार! सीएसएमटी-कसारा मार्गावर लवकरच धावणार १५ डब्यांची लोकल

मुंबई : मुंबईची जीवन वाहिनी मानल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुख्य मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या

Nashik : गंगापूर धरणातून विसर्गात वाढ; आता 12,600 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग

Nashik : गंगापूर धरणातून (Gangapur Dam) सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली असून, गुरुवार (23 जुलै) सकाळी 11

Beed Crime : धक्कादायक! डोळ्यात लिंबू पिळून विवाहितेचा छळ; माहेराहून पैसे आणण्यासाठी अमानुष अत्याचार

बीड  : बीड (Beed) जिल्ह्यातील परळी येथे विवाहितेच्या छळाची गंभीर घटना समोर आली आहे. फर्निचर खरेदीसाठी माहेरहून 2 लाख