Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय


मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य दिले जाणार आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सेवांमध्ये 'शासन प्रक्रिया पुनर्रचना' राबविण्यात येणार असून, या विभागाच्या पूर्वीच्या १५ सेवांचे सुसूत्रीकरण करून त्यांची संख्या आता १० करण्यात आली आहे. दस्तनोंदणी, विवाह नोंदणी आणि प्रमाणित नकला मिळविण्याची प्रक्रिया आता अत्यंत सुलभ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्वपूर्ण बदल केला. (Chandrashekhar Bawankule)


या नव्या प्रणालीनुसार, समान स्वरूपाच्या अनेक सेवांचे एकत्रीकरण करण्यात आले असून काही अनावश्यक सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. संगणकीकृत प्रणालीतून दस्तांची प्रमाणित नक्कल देण्याच्या तीन वेगवेगळ्या सेवा एकत्र करून त्यांची एकच सेवा तयार करण्यात आली आहे, तर विशेष विवाह कायद्यांतर्गत येणाऱ्या दोन सेवांचेही एकत्रीकरण करण्यात आले आहे. याशिवाय, विशेष कुलमुखत्यारपत्राचे अधिप्रमाणन करणे आणि सीलबंद मृत्यूपत्राचा लखोटा जमा करणे यांसारख्या सेवा आता काढून टाकण्यात येणार आहेत. (Chandrashekhar Bawankule)



नव्या बदलांनुसार, नागरिकांना आता वारंवार तीच कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही. डिजीलॉकर, आधार, पॅन आणि भूमी अभिलेख यांसारख्या शासकीय प्रणालींशी ही सिस्टीम जोडली जाणार असल्यामुळे आवश्यक माहिती आपोआप घेतली जाईल. ज्या सेवांसाठी कायद्याने प्रतिज्ञापत्र अनिवार्य नाही, तेथे नागरिकांचा त्रास वाचवण्यासाठी स्वयंघोषणापत्र स्वीकारण्यात येणार आहे. काही सेवांच्या शुल्कात बदल करण्यात आले आहेत. दस्त नोंदणीसाठीच्या 'गृहभेटीचे' सध्याचे ३०० रुपये शुल्क वाढवून ते ५००० रुपये करण्यात आले आहे. यासोबतच अभिलेख शोधासाठीचे दरही नव्याने सुचवण्यात आले आहेत. (Chandrashekhar Bawankule)


दस्तनोंदणी आणि नोटीस ऑफ इंटिमेशन फाईल करणे यांसारख्या सेवा आता केवळ १ दिवसात पूर्ण केल्या जातील, अशी सुधारित कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ही संपूर्ण यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यासाठी, 'आपले सरकार' आणि 'मैत्री' पोर्टलशी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या प्रणालीचे 'एपीआय'द्वारे एकत्रीकरण करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी

Jalgaon Crime : नवरा-बायकोमधील भांडणाचा धक्कादायक शेवट ! आई अन् मुलाने थेट...

Jalgaon Crime News : नवरा बायको यांच्यामध्ये होणारे आणि नंतर टोकाले पोहोचलेले वाद क्षणाधार्त आयुष्याची कशी राखरांगोळी करू

Shivendrasinhraje Bhosale : 'इन्फ्रा' प्रकल्पांच्या कंत्राटदारांना कामाच्या गुणवत्तेनुसार मिळणार 'रेटिंग'

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा निर्णय; ५०० कोटींहून मोठ्या प्रकल्पांसाठी नवी कार्यपद्धती मुंबई :