Nashik : दारणा धरणातून पाणी विसर्गात वाढ; 19 हजार 312 क्युसेकने पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Nashik : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर दारणा धरणातून होणाऱ्या पाणी विसर्गात वाढ करण्यात आली आहे. नाशिक पाटबंधारे विभागाने गुरुवारी (23 जुलै) सायंकाळी 7 वाजल्यापासून धरणातून 19 हजार 312 क्युसेक पाणी सोडण्याचा निर्णय घेतला असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.



नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा


पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, यापूर्वी धरणातून 15 हजार 498 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र, धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे सायंकाळी 7 वाजल्यापासून विसर्गात 3 हजार 814 क्युसेकने वाढ करण्यात आली आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास किंवा वाढल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दारणा नदीपात्र आणि नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी.


नदीपात्रात असलेले साहित्य, जनावरे तसेच इतर वस्तू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात. तसेच नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाने केले आहे. दरम्यान, संबंधित प्रशासकीय विभागांना आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असल्याची माहिती देण्यात आली आहे.



गंगापूर धरणातून विसर्गात वाढ


सोबतच गंगापूर धरणातून 13,932 क्यूसेक्सने विसर्ग वाढविण्यात आला आहे. तसेच, परिसरातील पावसाचे प्रमाण लक्षात घेता पुढील काळात विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामुळे गोदावरी नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, नदीपात्रात उतरू नये तसेच नदीकाठावर ठेवलेले साहित्य, जनावरे आणि इतर वस्तू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

WTC Final 2027 चे वेळापत्रक जाहीर! 'द ओव्हल'वर रंगणार अंतिम सामना; गुणतालिकेत भारताची घसरण

- ९ ते १३ जून २०२७ दरम्यान लंडनमध्ये होणार अंतिम लढत; ऑस्ट्रेलिया अव्वल, भारत पाचव्या स्थानावर मुंबई : जागतिक

Devendra Fadnavis : नीती आयोगाच्या निर्देशांकांवर पुढील ४ वर्षांत परिणामकारक कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

India at UN : संयुक्त राष्ट्र बैठकीत भारताचा पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा; बलुचिस्तानातील संसाधनांच्या शोषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

संयुक्त राष्ट्रांच्या (UN) उच्चस्तरीय बैठकीत भारताने नैसर्गिक संसाधनांच्या न्याय्य वापराचा मुद्दा उपस्थित करत

Pavana Dam : पवना धरण ९३ टक्क्यांहून अधिक भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मावळ : मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

Jalgaon Crime News : सोलर सिस्टीम मंजुरीसाठी मागितली लाच, महावितरणचा अभियंता रंगेहाथ ताब्यात

Jalgaon Crime News : जळगावमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. सोलर प्रकल्पाच्या रिलीज ऑर्डरसाठी

Commonwealth Games 2026 : उद्घाटनापूर्वीच लव्हलिना बोरगोहेनमुळे भारताचे पहिले पदक निश्चित!

CWG2026 : ग्लास्गो येथे रंगणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ (CWG 2026) च्या औपचारिक उद्घाटनापूर्वीच भारताने आपल्या