श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात पोलिस पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झालेले हेड कॉन्स्टेबल आशिक हुसेन यांचे उपचारादरम्यान निधन झाले. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घालत हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकरनाग रोड परिसरात तैनात असलेल्या पोलिस पथकावर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी अचानक गोळीबार केला. हल्ल्यादरम्यान अनेक फेऱ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात हेड कॉन्स्टेबल आशिक हुसेन गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने घटनेला दुजोरा देताना सांगितले की, हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून संशयितांचा शोध घेण्यासाठी व्यापक शोध आणि नाकाबंदी मोहीम सुरू आहे.(Shreenagar)
नवी दिल्ली : लोकसभेने तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार कल्याण बॅनर्जी यांना पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित केले आहे. लोकसभेत ...
संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी विविध पथके कार्यरत आहेत. दरम्यान, पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाची प्रॉक्सी संघटना मानल्या जाणाऱ्या द रेसिस्टन्स फ्रंट (TRF)ने सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला आहे. मात्र, या दाव्याची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही. सुरक्षा यंत्रणा या दाव्यासह संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून सर्व संभाव्य धागेदोरे पडताळून पाहिले जात आहेत.
अमरावती : आंध्र प्रदेशात कोरोना विषाणूचे नवे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. मंगळवारी राज्यात कोविड-19 चे ७ नवे रुग्ण नोंदविण्यात आले. या ...
टीआरएफ ही संघटना ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द झाल्यानंतर सक्रिय झाली. सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवाद्यांनी या संघटनेची स्थापना केली असून जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना स्थानिक स्वरूप देणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लष्कर-ए-तैयबाचे नाव लपवणे हा तिचा उद्देश असल्याचे मानले जाते. भारत सरकारने जानेवारी २०२३ मध्ये बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (UAPA) अंतर्गत टीआरएफला बंदी घातलेली दहशतवादी संघटना घोषित केले आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, ही संघटना दहशतवादी कारवाया, दहशतवाद्यांची भरती, घुसखोरी आणि विविध हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग घेत असल्याचा आरोप आहे.





