Devendra Fadnavis : विरोधकांनी राजकारणासाठी देशाची बदनामी करू नये!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; वाढदिवशी सर्व सोहळे टाळत पायी वारीमध्ये सहभागी


मुंबई : "विद्यार्थ्यांच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करणे हे सरकारचे कर्तव्य असून केंद्र व राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय घेईल. परंतु, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय स्वार्थासाठी काही पक्ष देशाची बदनामी करत आहेत, हे अयोग्य आहे," अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बुधवारी दिली. स्वतःच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व राजकीय व औपचारिक सोहळे टाळून पंढरपूर वारीमध्ये पायी चालत सहभागी झाल्यानंतर ते सोलापूर येथे माध्यमांशी बोलत होते.


दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना टोला लगावताना मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) म्हणाले की, सर्वांनी सर्वप्रथम देशाचा विचार केला पाहिजे. परीक्षा किंवा शिक्षण व्यवस्थेत काही उणिवा राहिल्या असतील तर त्या दूर केल्या जातील आणि सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांशी पूर्णपणे समरस आहे. मात्र, या मुद्द्याचे राजकारण करून देशाची बदनामी करणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.



आपल्या वाढदिवशी वारीत सहभागी होण्याबाबत आनंद व्यक्त करताना फडणवीस म्हणाले, "आजच्या दिवशी वारीत चालण्याची आणि जगद्गुरू तुकाराम महाराज तसेच संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन मिळणे हा अतिशय भाग्याचा योग आहे. वारकरी हे माऊलींचे जिवंत स्वरूप आहेत आणि त्यांचे सानिध्य मिळणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. माऊलीकडे काही मागण्याची गरज नसते, तरीही राज्यातील शेतकरी सुखी व्हावा आणि चांगला पाऊस पडावा, हेच साकडे मी घातले आहे." (Devendra Fadnavis)



या वेळी त्यांनी पंढरपूर वारीच्या नियोजनाचे कौतुक केले. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यंदाच्या वारीतील गर्दीचा अंदाज घेतला जात असून, यंदाच्या वारीने सर्व जुने विक्रम मोडल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या स्वच्छतेच्या व आरोग्य सुविधांच्या नियोजनामुळे वारकऱ्यांची सोय झाली असून, चंद्रभागेच्या वाळवंटातील स्वच्छता आणि जर्मन हँगरसारख्या आधुनिक सुविधांमुळे वारीचे स्वरूप अधिक निटनेटक झाले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. (Devendra Fadnavis)




Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Supriya Sule and Vinod Tawde : सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे बैठक सोडून अचानक निघाले, एका कारमधून गेले; चर्चेला उधाण

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच एक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Bharat Gogawale : नाशिकला गिरीश महाजन आणि रायगडमध्ये भरत गोगावले करणार ध्वजारोहण

मुंबई : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय समारंभासाठी राज्य शासनाकडून जिल्हा निहाय ध्वजारोहण