Amravati Crime : कबुतरावरून वाद ! दोन जिवलग मित्रांची हत्या; आठ जणांना अटक

अमरावती : अमरावतीच्या वलगाव परिसरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. कबूतर चोरीच्या आरोपावरून दोन जीवलग मित्रांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घटली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाला आहे. वलगाव येथे झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलीसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलीसांनी वलगावच्या सरपंचासह सात जणांना अटक केली आहे. (Amravati Crime)



नेमकं प्रकरण काय ?


मिळालेल्या माहितीनुसार, कबूतर चोरल्याच्या वादातून ऋतिक पंडित आणि संजोग जोशी या दोन तरुणांची पाच हल्लेखोरांनी वलगाव बसस्थानक परिसरात धारदार शस्त्राने वार करत हत्या केली.किरकोळ कारणावरून झालेल्या या हत्याकांडात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.



मध्यरात्रीच्या सुमारास संजोग आणि ऋतिक हे दोघे वलगाव बसस्टँड परिसरात गेले होते. त्यावेळी त्याच्यांवर पाच जणांनी जीवघेणे हल्ला केला. धारदार शस्त्राने त्यांना जागीच संपवण्यात आले होते. हा हल्ला इतका भयानक होता की, या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अत्यंत किरकोळ आणि जुन्या वादातून ही हत्याकांडाची घटना घडली होती. संजोग जोशी आणि ऋतिक पंडित यांची हत्या करणारे पाचही आरोपी हे २५ वर्षे वयोगटातील आहेत. या प्रकरणात सरपंचाचा सहभाग आढळून आल्यामुळे त्यांना देखील अटक करण्यात आली आहे. या हत्येचा सखोल तपास वलगाव पोलिस करत आहेत. या सर्व आरोपींना आज अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (Murder Case)

Comments
Add Comment

Jharkhand : झारखंडमध्ये झामुमो - काँग्रेस सरकारचा विद्यार्थ्यांवर लाठीमार

रांची : विद्यार्थ्यांशी चर्चा करा, त्यांच्यावर कठोर कारवाई करणे टाळा असे आवाहन एक्स पोस्ट करून संसदेतील विरोधी

Holiday : मुंबईत दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनला मिळणार शासकीय सुट्टी

मुंबई : यंदा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनच्या दिवशी शासकीय सुट्टी मिळणार आहे. या

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

National Highway : राष्ट्रीय महामार्गालगत नवीन ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांना बंदी

राज्य सरकारचा निर्णय; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांच्या आत पाडण्याचे निर्देश मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Crime News : राज्यातले आणखी एक बेकायदा औषधनिर्मिती युनिट उद्ध्वस्त, DRI ची कारवाई

मुंबई : मादक द्रव्ये आणि मनोविकारकारक पदार्थांच्या अवैध उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय तस्करीविरोधात आपली