Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. आंध्र प्रदेशानंतर आता महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, आरोग्य विभागाने यासंदर्भात महत्त्वाचा खुलासा करत नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. (Maharashtra Corona Alert)


आंध्र प्रदेशात २६ जून ते १६ जुलैदरम्यान कोविड-१९चे १२ रुग्ण आढळले होते. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर १ जुलै ते १६ जुलैदरम्यान आणखी ११ जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाली. मृत्यू झालेल्या चारही रुग्णांना आधीपासून गंभीर सहव्याधी (Comorbidities) होत्या, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Maharashtra Corona Alert)



दरम्यान, महाराष्ट्रातही कोरोनाचे काही रुग्ण आढळल्याने नव्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, राज्याच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की, सध्या आढळणारी बहुतांश प्रकरणे सौम्य स्वरूपाची असून राज्यात कोरोनाच्या नव्या लाटेची कोणतीही चिन्हे दिसून आलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाण्याचे कारण नसल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे. (Maharashtra Corona Alert)



महाराष्ट्रात यंदा ४८ रुग्णांची नोंद :


राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२६ या वर्षात आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण ४८ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये जानेवारीत ३, फेब्रुवारीत १, जूनमध्ये ११ आणि जुलैमध्ये आतापर्यंत २१ रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे या रुग्णांपैकी एकाचाही मृत्यू झालेला नाही. आरोग्य विभागाने नागरिकांना आवश्यक ती स्वच्छता, हात धुण्याची सवय आणि आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन केले असून, सध्या घाबरण्याऐवजी सतर्क राहण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. (Maharashtra Corona Alert)

Comments
Add Comment

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे

Pune Jagannath Rath Yatra 2026 : पुणेकरांनो अलर्ट! जगन्नाथ रथयात्रेमुळे उद्या 'या' प्रमुख रस्त्यांवर ट्रॅफिक डायव्हर्जन; घराबाहेर पडण्यापूर्वी मार्ग तपासा

पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या म्हणजेच रविवारी १९ जुलै रोजी भगवान जगन्नाथ रथयात्रेनिमित्त शहरातील

NEET Results 2026 : NEET निकालावर पुन्हा संशय! अँसर कीनुसार ७००+ गुणांचा दावा, पण स्कोअरकार्डवर फक्त ८७; विद्यार्थिनीसह कुटुंबाचा आक्रोश

बीड : देशभरात NEET परीक्षेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी

Satara Accident : पालखीचे दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; नेमकं काय घडलं?

सातारा : सातारा-पुसेगाव मार्गावर (Satara-Pusegaon Road) शुक्रवारी (१७ जुलै) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फॉर्च्युनर

Maharashtra Election : मतदार यादी पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम यादी १९ ऑक्टोबरला

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाचे