Ashok Kharat : अशोक खरातचा पाय खोलात ! ईडीचे तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र; रिमोटचा साप अन् ...

Ashok Kharat: नाशिक काय तर संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या अशोक खरातच्या अडचणीत नव्याने वाढ झाली आहे. धर्माच्या नावाखाली आणि चमत्काराचा खोटा आव दाखवत निष्पाप भक्तांना कोट्यवधी रुपयांना लुटणाऱ्या आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरात विरोधात तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. अंमलबजावणी संचालनालयाने ही कारवाई केली आली या आरोपपत्रात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. आरोपपत्रात भोंदू खरातच्या आजवरच्या काळ्या कारनाम्यांचा संपूर्ण लेखाजोखा मांडण्यात आला आहे. तब्बल 30 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. भोंदूबाबा खरातच्या संपत्तीचा संपूर्ण तपशीलच यात देण्यात आला आहे.



रिमोट कंट्रोलने चालणारे कृत्रिम साप अन्


ईडीने आरोपपत्रात दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरात हा स्वतःला भगवान शिवाचा अवतार असल्याचा भक्तांना सांगायचं. भक्तांवर स्वतःचा प्रभाव निर्माण करण्यासाठी तो धार्मिक कार्यक्रमांमध्ये हायटेक तंत्रज्ञानाचा गैरवापर करायचा. लोकांना खोट्या शक्तीची भुरळ पाडण्यासाठी तो रिमोट कंट्रोलने चालणारे कृत्रिम साप वापरायचा, तसेच वाघाच्या कातड्याचा वापर करून आपल्याकडे अलौकिक शक्ती असल्याचा आभास निर्माण करायचा. इतकेच नव्हे तर, महिला भक्तांना गुंगीचे औषध दिल्याचाही खुलासा आरोपपत्रात करण्यात आला आहे.



पॉलिश केलेले चिंचोके 2 लाख रुपयांना


त्यासोबतच, बाजारात कवडीमोल भावाने मिळणारे चिंचोके त्याने पॉलिश करुन त्याने ते प्रत्येकी 2 लाख रुपयांना विकले. तसेच खडे आणि मधाच्या बाटल्यांना प्रत्येकी 9 लाख रुपयांना विकून त्याने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं आरोपपत्रात नमूद आहे. खरातचे श्रीमंत व्यावसायिकांना टार्गेट करत असे. दैवी प्रकोप तसेच कुटुंबातील अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होणार आहे, तुमचा व्यवसाय पूर्णपणे कोलमडणार अशी भीती तो श्रीमंतांच्या मनात घालायचा. या भितीपोटी घाबरलेले व्यावसायिक त्याच्या जाळ्यात ओढले जायचे आणि त्यानंतर हा भोंदू बाबा 'अवतार पूजा' आणि मोठ्या देणग्यांच्या नावाखाली त्याने कोट्यावधी रुपये उकळायचा.



142 बेनामी खात्यांमधून कोट्यवधींची उलाढाल


लोकांना लुटून कमावलेली ही काळी कमाई पांढरी करण्यासाठी खरातने मोठा कट रचला होता. त्याने तब्बल 142 बेनामी खात्यांमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली. सहकारी पतसंस्था, बेनामी बँक खाती, त्याचे कुटुंबीय आणि निकटच्या साथीदारांच्या माध्यमातून त्याने या पैशांचे कथित मनी लॉन्ड्रिंग केले. हा सगळा पैसा त्याने महाराष्ट्रातील विविध भागांत रिअल इस्टेट आणि आलिशान मालमत्तांमध्ये गुंतवल्याचा गंभीर आरोप ईडीने केला आहे. ईडीच्या या 3000 पानांच्या आरोपपत्रामुळे आता या भोंदू बाबाचा पाय आणखी खोलात गेला आहे.



आतापर्यंत 19.20 कोटींची मालमत्ता जप्त


या प्रकरणात आतापर्यंत 19.20 कोटींची स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त करण्यात आली आहे. तर 17.70 कोटींची रोकड, बँक ठेवी, विदेशी चलन, सोने-चांदीचे दागिने आणि अलिशान मर्सिडीज जप्त करण्यात आली आहे. खरात यांचे सहकारी अरविंद बावाके यांनी 18 ते 20 कोटींच्या रोख व्यवहारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील एका सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष नामकरण आवारे यांनी 34 बेनामी खाती उघडण्यास मदत करून व्यवहार लपवल्याचे तपासात समोर आलं आहे. 

Comments
Add Comment

Jalna : कॉलेजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि चौघे जखमी

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Boss Scam : अधिकारी बनून पैशांची मागणी; 'बॉस स्कॅम'पासून सावधान राहण्याचे केंद्राचे आवाहन

नवी दिल्ली : व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा इतर संदेशवहन माध्यमांचा वापर करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर

New IT Rules : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नवीन आयटी नियम कठोर, आक्षेपार्ह मजकूर हटवण्याची मुदत २४ तासांवरून थेट २ तासांवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी आक्षेपार्ह आणि संवेदनशील मजकूर हटवण्याच्या मुदतीत

PM Modi and Sukhbir Singh Badal Meeting : पंतप्रधान मोदी आणि सुखबीर सिंग बादल यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्ष (भाजप)

PM Modi : काळजी करू नका, मी तुमच्यासोबत आहे, तृणमूल आणि उबाठाच्या बंडखोर खासदारांना पंतप्रधानांचे आश्वासन

नवी दिल्ली: संसदेत सुरू असलेल्या गदारोळादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या