NCP : पार्थ पवारांना केंद्रात मंत्री करा! राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षांचे सुनेत्रा पवारांना पत्र

पटेल-तटकरे मुख्यमंत्री भेटीमागे हेच पत्र जबाबदार असल्याची चर्चा



मुंबई : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत संघर्ष आता आणखी तीव्र झाला आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना १३ जुलै २०२६ रोजी लिहिलेले एक पत्र समोर आले असून, या पत्रामुळे पक्षांतर्गत नाराजीनाट्याचा दुसरा अंक सुरू झाला आहे. या पत्रात राज्यसभा खासदार पार्थ पवार यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी केंद्राकडे शिफारस करण्याची मागणी करण्यात आली आहे. या पत्रप्रपंचामुळे आणि त्यातील टीकेमुळे पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे कमालीचे संतप्त झाले असून, याच नाराजीतून त्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तक्रार केल्याचे सूत्रांकडून समजते आहे.



उदय आहेर यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे पार्थ पवार यांच्या नावाची शिफारस करताना आठ प्रमुख कारणांचा दाखला दिला आहे. पार्थ पवार हे २१ व्या शतकातील उमद्या तरुणांचे दूरदृष्टी असलेले नेतृत्व असून लंडन येथे उच्च शिक्षण पूर्ण केल्यामुळे त्यांना जागतिक पातळीवरील आर्थिक व राजकीय घडामोडींचे उत्तम आकलन आहे, असे या पत्रात म्हटले आहे. तसेच त्यांचे इंग्रजी आणि हिंदी भाषांवर प्रभुत्व असल्याने त्याचा उपयोग देशपातळीवर पक्षवाढीसाठी होऊ शकतो, असा दावाही आहेर यांनी केला आहे.



या पत्रातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पक्षातील काही नेत्यांचा 'अनाजीपंत' असा उल्लेख करत टीका करण्यात आली आहे. पार्थ पवार यांच्याकडे राजकीय परिपक्वता नाही असा खोटा प्रचार पक्षातीलच काही घटकांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. ज्याप्रमाणे इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करण्याचे कारस्थान तत्कालीन अनाजीपंतांनी केले होते, तसेच कृत्य आज पक्षातीलच काही लोक करत असून अजितदादांच्या निधनानंतर एका ३८ वर्षांच्या तरुण नेत्याची कारकीर्द संपवण्याचा हा कट असल्याचा गंभीर आरोप आहेर यांनी केला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पार्थ पवार यांचे खच्चीकरण करण्याचे जे प्रयत्न झाले, त्यावर मात करण्यासाठी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देऊन विरोधकांना सडेतोड उत्तर द्यावे, हीच अजितदादांचीही इच्छा होती आणि त्यांचे हे अपूर्ण स्वप्न आता सुनेत्रा पवार यांनी पूर्ण करावे, असे या पत्रात म्हटले आहे.



नेमके काय घडले?


दरम्यान, पक्षातील एका प्रदेश उपाध्यक्षाने अशा भाषेत पत्र लिहून ज्येष्ठ नेत्यांना लक्ष्य केल्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे अत्यंत संतप्त झाले आहेत. पार्थ पवार आणि त्यांच्या समर्थकांकडून ज्येष्ठ नेत्यांना कशा प्रकारे बाजूला सारले जात आहे, याबद्दल या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणे मांडल्याचे समजते. दुसरीकडे, या पत्रानंतरच पटेल व तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपली तक्रार केल्याचा दावा खुद्द उदयकुमार आहेर यांनी केला असून, या संपूर्ण वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे.

Comments
Add Comment

Water Supply Cut News : वांद्रे पूर्व ते अंधेरी पूर्व भागांत येत्या मंगळवार, बुधवार पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पूर्व ते वांद्रे पूर्व के दक्षिण आणि एच पूर्व विभागातील पाणीपुरवठा

Best Budget Bike : दिखाऊपणा कशाला? ७० किमी मायलेज आणि ५५ हजारांपासून किंमत; बजेटमधील ५ सर्वोत्तम बाईक!

सध्याच्या काळात महागाई आणि सतत वाढणारे इंधनाचे दर यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरि

BMC News : वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ मधील नागरिकांना ३ ते ४ दिवस कचऱ्याची राहणार समस्या

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ प्रशासकीय विभागात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी

Panchkula Murder Case : पंचकुलात खळबळ! मोलकरणीनेच केली रिटायर्ड कॅप्टनच्या पत्नीची हत्या; सीसीटीव्हीमुळे बिंग फुटले

Haryana : हरियाणामधील पंचकुला येथे घडलेल्या एका थरारक आणि खळबळजनक हत्याप्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

Eknath Shinde : 'शिवसेना कोणाची?' जनतेनेच दिला कौल; ४० चे ६० आमदार करून जनतेने शिक्कामोर्तब केलं

मुंबई : शिवसेना पक्षाच्या मालकीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)

Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat : 'जेन-झी' आणि 'जेन-अल्फा' जुन्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक!

- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; लोकशाहीत आंदोलनसुद्धा संवादाचेच एक माध्यम मुंबई : "भारताच्या शिक्षणव्यवस्थेत अजूनही