Devendra Fadnavis : २६/११ हल्ल्याबाबत आर. व्ही. एस. मणी यांचे दावे धक्कादायक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी


मुंबई : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्या संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाचे माजी अवर सचिव आर. व्ही. एस. मणी यांनी केलेले खुलासे अत्यंत धक्कादायक असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी मांडली. मणी यांच्या दाव्यांमुळे संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला असून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत, असेही ते म्हणाले.



मंत्रालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, "मणी यांनी केलेले दावे प्रचंड हादरवून सोडणारे आहेत. या विषयातील काही संशयास्पद बाबी मी स्वतः तत्कालीन विधानसभेत उपस्थित केल्या होत्या. त्या काळात मुंबई हल्ल्याबाबत आधी काय 'इंटेलिजन्स' (गुप्तचर माहिती) मिळाले होते, याचे पुरावे मी विधानसभेच्या पटलावर मांडले होते. आता गृह मंत्रालयातील एका माजी उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडूनच असे वक्तव्य समोर आल्याने या संशयाला बळकटी मिळत आहे. हे प्रकरण देशाच्या सुरक्षेशी निगडित असल्याने या संदर्भात योग्य आणि सखोल चौकशी झाली पाहिजे, हीच माझी अपेक्षा आहे."





केंद्रीय गृह मंत्रालयाचे माजी अवर सचिव आर. व्ही. एस. मणी यांनी नवी दिल्लीत एका मुलाखती दरम्यान २६/११ च्या मुंबई हल्ल्याबाबत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, हा दहशतवादी हल्ला म्हणजे तत्कालीन काँग्रेस सरकार आणि पाकिस्तानची गुप्तचर संघटना 'आयएसआय' यांच्यातील एक प्रकारे 'फिक्स मॅच' (पूर्व-नियोजित कट) होता. मणी यांनी दावा केला की, "पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब जिवंत पकडला गेल्यामुळेच विरोधकांचा 'हिंदू दहशतवाद' हा कथित नॅरेटिव्ह तयार करण्याचा कट अपयशी ठरला. जर कसाब जिवंत पकडला गेला नसता, तर या संपूर्ण जिहादी हल्ल्याचे खापर हिंदू संघटनांवर फोडण्याचा पूर्ण प्रयत्न झाला असता."(News)



काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप


- आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ मणी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यावर निशाणा साधला. २००६ मध्ये दिग्विजय सिंह यांनी गृह मंत्रालयाकडे 'हिंदू दहशतवादाशी' संबंधित प्रकरणांची माहिती मागितली होती, परंतु तत्कालीन शासकीय अभिलेखात (Record) असा कोणताही उल्लेख किंवा खटला नोंद नव्हता. इतकेच नव्हे तर, २०१० पर्यंत गृह मंत्रालयाच्या अधिकृत दप्तरात 'हिंदू दहशतवाद' असा कोणताही शब्द अस्तित्वात नव्हता, असे मणी यांनी स्पष्ट केले.
- यासोबतच, गुजरात मधील बहुचर्चित 'इशरत जहाँ' चकमक प्रकरणाचा उल्लेख करत मणी यांनी खळबळजनक आरोप केला. या प्रकरणाचा गैरवापर करून गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह यांना राजकीय दृष्ट्या लक्ष्य करण्याचा आणि त्यांना अडचणीत आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला होता, असेही मणी यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा