मुंबई (विशेष प्रतिनिधी : मुंबईतील कुर्लासह इतर भागांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहार तलावातील पाणी पुरवठा आता तांत्रिक कारणांमुळे खंडित होणार नाही. विहार तलावातील पाण्याचे येथीलच जलशुध्दीकरण प्रकल्पांतर्गत शुध्दीकरण करून पुरवठा करण्यात येते. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे येथील वीज पुरवठा खंडित झाल्यास अनेक भागांमध्ये पाणी कपात करावी लागते. त्यामुळे भविष्यात अशाप्रकारची तांत्रिक कपात टाळण्यासाठी महापालिकेच्यावतीने विहार जलशुद्धीकरण केंद्र, आरे रोड, पवई येथे वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी वीजपुरवठा स्त्रोत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरण आणि तलावांमधील पाणी साठा आता ९० टक्क्यांच्यावर पोहोचला असून मागील वर्षांच्या तुलनेत ...
विहार जलशुध्दीकरण केंद्राचे नूतनीकरण सन २०१९ साली करण्यात आ याठिकाणी पर्यवेक्षी नियंत्रण आणि डेटा संपादन (स्काडा) प्रणाली पीएलसी प्रणाली, विदयुत हरिनीकरण इलेक्ट्रोक्लोरिनेशन यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश केलेला आहे. विहार जलशुद्धीकरण केंद्रामध्ये २२ केव्हीए इतक्या परिमाणाचा समर्पित वीज पुरवठा एनआयटीआयई व नवल डॉकयार्ड या उपकेंद्रामार्फत अखंडित परिचलनाकरिता देण्यात आलेला आहे. विहार जलशुद्धीकरण केंद्रामध्ये २२ केव्हीए इतक्या परिमाणाचा समर्पित वीज पुरवठा असूनदेखील याठिकाणी वारंवार वीज पुरवठा खंडित होत असतो. मागील १८ जून २०२५ रोजी हा पुरवठा १२ तासाहून अधिक काळ खंडित झाला होता. दुर्देवाने, त्यादिवशी पर्यायी वीज पुरवठाही तांत्रिक कारणामुळे खंडित होता. त्यानंतर, हा वीज पुरवठा काही तासानंतर तांत्रिकी दुरुस्ती करुन नियमित करण्यात आला. परंतु नेवल डॉकयार्ड या उपकेंद्रामार्फत येणारा समर्पित वीज पुरवठा सद्यस्थितीत बंद आहे. त्यामुळे सध्यपरिस्थितीत विहार जलशुद्धीकरण केंद्रास एकाच उपकेंद्रामार्फत वीज पुरवठा असून भविष्यकाळात काही बिघाड झाल्यास कोणताही पर्यायी विज पुरवठा उपलब्ध नाही,असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
या बिघाडामुळे विदयुत हरिणिकरण (इलेक्ट्रोक्लोरिनेशन) प्लांट या प्रणालीतील अतिसंवेदनशील विदयुत उपकरणे खराब झाली आहेत. अशा घटनांमुळे विदयुत पॅनेलमध्ये झालेल्या बिघाडामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा सतत कार्यरत असलेल्या ठिकाणी पर्यायी वीजपुरवठा स्त्रोत ही अत्यावश्यक बाब ठरते. त्यामुळे विहार जलशुद्धीकरण केंद्र, आरे रोड, पवई येथे वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी वीजपुरवठा स्त्रोत उपलब्ध करुन देण्याचे तसेच इतर संलग्न विद्युत, यांत्रिकी व स्थापत्यविषयक कामे करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यासाठी आर जे इन्फोटेक या कंपनीची निवड करण्यात आली असून यासाठी १कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.