Ahilyanagar : हॉटेल व्यावसायिक प्रकरणानंतर व्यापारांचा एल्गार! सलग दुसऱ्या दिवशी शहर कडकडीत बंद

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर (Shrirampur) शहरात गुन्हेगारांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. गेल्या अकरा दिवसात चार जणांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. अवघ्या ११ दिवसांत प्राणघातक हल्ल्याच्या तब्बल चार घटना घडल्याने आधीच दहशतीत असलेल्या श्रीरामपूरकरांच्या संयमाचा बांध अखेर शनिवारी भरदुपारी फुटला. एका तरुण हॉटेल व्यावसायिकाची भरदिवसा झालेल्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण शहर हादरले असून, या गुंडशाहीविरोधात व्यापारी, सामाजिक संघटना आणि सर्वपक्षीय नेत्यांनी ‘बेमुदत बंद' पुकारला आहे. ( Shrirampur Crime News )



नेमकं काय घडलं ?


शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास नेवासा रस्त्यावरील ‘हॉटेल लक्ष्मीनारायण अँड लॉजिंग’ येथे ३४ वर्षांचे हॉटेल व्यावसायिक आकाश शेखर दुबय्या यांची हत्या करण्यात आली. हॉटेल व्यावसायिक आकाश शेखर दुबय्या हे आपल्या व्यवसायात व्यस्त होते. माहितीनुसार, तिथे आलेल्या तिघा मद्यधुंद तरुणांनी अत्यंत किरकोळ कारणावरून आकाश यांच्याशी वाद घातला. त्यांच्यातील शाब्दिक वाद इतका विकोपाला गेला की, त्या आरोपींनी सर्रासपणे धारदार शस्त्राने आकाश यांच्यावर सपासप वार करत त्यांची निर्घृण हत्या केली. भरदिवसा झालेल्या या थरारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ( Shrirampur Crime News )



संतप्त नागरिकांची पोलीस स्टेशनमध्ये घोषणाबाजी


गेल्या अकरा दिवसात चार जणांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटना शहरात घडल्याने रविवारी संपूर्ण श्रीरामपूर शहरात तीव्र रोषाचा ज्वालामुखी फाटला. संतापलेले नागरिक, व्यापारी आणि दुबय्या परिवाराने थेट आकाश यांचा मृतदेह श्रीरामपूर पोलीस ठाण्यासमोर आणून ठेवला. “शहरातील रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांवर आणि अवैध धंदेवाल्यांवर जोपर्यंत ‘मोक्का’ (MCOCA) कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,” अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली. संतप्त आंदोलकर्त्यांनी यावेळी गुन्हेगारी आणि पोलिसांच्या ढिसाळ कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ( Shrirampur Crime News )



बेमुदत बंदचा आज दुसरा दिवस


या हत्याकांडाच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी बेमुदत बंद पुकारला. या बेमुदत बंदचा आज दुसरा दिवस असून शहरातील मुख्य बाजारपेठ, कापड बाजार, किराणा दुकाने, भाजीमंडी आणि वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प होती. शहरात वाढलेले अवैध धंदे, मद्यपींचा सुळसुळाट आणि भाईगिरी यामुळे सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संपूर्ण श्रीरामपुरात कमालीची तणावपूर्ण शांतता पसरली आहे. पोलिसांच्या पुढील कारवाईकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : धर्मांतर बंदी कायद्यासाठी मंत्री नितेश राणेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

हिंदुत्ववादी संघटनांचे अभिनंदन; बळजबरीने धर्मांतर करणाऱ्यांना १० वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद मुंबई :

Devendra Fadnavis : मुंबई पालिकेतील 'इनोव्हा'च्या प्रस्तावावरून मुख्यमंत्र्यांनी केली कानउघाडणी

उधळपट्टीवर नाराजी; जनतेचा पैसा विकासकामांवरच खर्च करण्याचे निर्देश मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील वैधानिक व

Simhastha Kumbh Mela 2027 : सिंहस्थापूर्वी नाशिक हायटेक ! शहरभर दोन महिन्यांत सुरू होणार 1,500 अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे

Simhastha Kumbh Mela 2027 : सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापन अधिक सक्षम

Muthoot Finance : मुथूट फायनान्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; तिमाही निकालानंतर गुंतवणूकदारांची चिंता वाढली

मुंबई: गोल्ड लोन क्षेत्रातील आघाडीची कंपनी मुथूट फायनान्सच्या शेअर्समध्ये सोमवारी मोठी घसरण झाली. कंपनीच्या

Private Vehicle Police Sticker : खासगी वाहनांवर 'पोलीस' लिहून चमकोगिरी करणे महागात पडणार

- विशेष तपासणी करून कारवाई होणार; वाहतूक विभागाचे राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांना पत्र मुंबई : आपल्या खासगी

Nashik TCS Case : TCS नाशिक प्रकरणात पाच आरोपींना सशर्त जामीन

Nashik TCS Case : नाशिक येथील बहुचर्चित TCS कंपनीमधील लैंगिक छळ आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणातील पाच आरोपींना नाशिक