Monday, July 13, 2026

Jejuri Palkhi Accident : जेजुरी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर

Jejuri Palkhi Accident : जेजुरी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर

पुणे : पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान झालेल्या भीषण अपघातात तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेने वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली असून राज्यभरातून दुःख व्यक्त केले जात आहे. या अपघाताबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून मृत वारकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. दुर्घटनेतील जखमी वारकऱ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू आहेत. (Jejuri Palkhi Accident)

घटनेची माहिती मिळताच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य आणि मदतकार्याचा आढावा घेतला जात आहे. प्रशासनाकडून संपूर्ण परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून जखमींना सर्वोत्तम उपचार मिळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. (Jejuri Palkhi Accident)

राज्य सरकारने या दुर्घटनेतील मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे. (Jejuri Palkhi Accident)

दरम्यान, पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी अधिक खबरदारी घेण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहनचालकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. (Jejuri Palkhi Accident)

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >