पुणे : श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात (Palkhi Procession) लाखो वारकरी भक्तीभावाने सहभागी झाले होते. मात्र, या पवित्र सोहळ्यालाच काही चोरट्यांनी गालबोट लावल्याचे समोर आले आहे. गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या (Gold Chains), मंगळसूत्रे आणि महागडे मोबाईल (Mobile) चोरणाऱ्या टोळीविरोधात पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठी कारवाई करत तब्बल ८९ संशयितांना ताब्यात घेतले आहे.
पालखी सोहळ्यादरम्यान शहरात चोरीच्या ११ घटना नोंदवण्यात आल्या. त्यापैकी ९ घटना हडपसर (Hadapsar) परिसरात घडल्याने खळबळ उडाली. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी वारकऱ्यांचे मोबाईल आणि दागिने लंपास केले. या प्रकरणी हडपसर, समर्थ, विश्रामबाग, शिवाजीनगर, वानवडी आणि खडकी पोलीस ठाण्यांमध्ये (Police Station) स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Mumbai Crime : संतापजनक! मुंबईत सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार, संतप्त नागरिकांचा रस्ता रोको आंदोलन
मुंबई : मुंबई (Mumbai) येथील पायधुनी परिसरात अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका ७ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार (Sexual assault) झाल्याची माहिती समोर ...
चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Crime Branch) चार विशेष पथके (Special Teams) तैनात केली होती. या कारवाईदरम्यान ६७ महिला आणि २२ पुरुष अशा एकूण ८९ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. या सर्वांची सध्या कसून चौकशी सुरू असून, वारीच्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी महिला चोरांची मोठी टोळी सक्रिय असल्याचे तपासात समोर आले आहे.
वानवडी (Wanwadi) परिसरातील शंकरमठ-रामनाथ मळा येथे पालखी दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाच्या पँटच्या खिशातून सुमारे ४० हजार रुपयांचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. मात्र, नागरिकांनी प्रसंगावधान राखत दोन संशयितांना रंगेहात पकडून थेट पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी चोरीला गेलेला मोबाईल जप्त केला आहे.
Thane Crime : क्लिनिंगसाठी आलेल्या महिलेने चोरले ३.५ लाखांचे मंगळसूत्र; ठाणे पोलिसांनी तासाभरात परत मिळवले
ठाणे पोलिसांची कामगिरी, अवघ्या एका तासात मिळवले चोरी झालेले दागिने
ठाणे : ठाण्यातील (Thane) राबोडी पोलिसांनी जलद कारवाई करत घरातून चोरीला गेलेले सुमारे ...
इतकी मोठी कारवाई करूनही हडपसर परिसरात मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना कशा घडल्या, याचा तपास पुणे पोलीस करत आहेत. दरम्यान, पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांनी गर्दीत आपल्या मौल्यवान वस्तू, दागिने आणि मोबाईलची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.