Maharashtra Politics : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा मुहूर्त ठरला?

- ४८-२९-२२ चा फॉर्म्युला निश्चित; मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यादीवर करणार शिक्कामोर्तब


मुंबई : राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार सत्तेवर आल्यापासून रखडलेल्या आणि सत्ताधारी पक्षांतील नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या नजरा लागून राहिलेल्या 'शासकीय महामंडळ' वाटपाचा अखेर मुहूर्त ठरला आहे. महायुतीमधील धुसफूस टाळण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना सत्तेत वाटा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेतला असून, भाजपसह मित्रपक्षांच्या नेत्यांना महामंडळांचे जागावाटप महिनाभरात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, तिन्ही पक्षांमध्ये ४८-२९-२२ असा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला निश्चित झाला असून, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आगामी बैठकीत यावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. ( Maharashtra Politics)



महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर आता अंतिम यादी तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीमधील संख्याबळ लक्षात घेऊन महामंडळांचे (Mahamandal) वाटप निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, भाजप ४८ टक्के महामंडळे, शिवसेना २९ टक्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसला २२ टक्के महामंडळे दिली जातील. विशेष म्हणजे महायुतीमधील एका छोट्या पक्षालाही १ टक्के जागांवर सामावून घेतले जाणार आहे. दरम्यान, कोणत्या पक्षाला नेमके कोणते महामंडळ (उदा. सिडको, म्हाडा, एसटी) मिळणार, हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले असले, तरी मुख्यमंत्र्यांसोबतच्या उच्चस्तरीय बैठकीत कोणत्या महामंडळावर कोणाची वर्णी लावायची, याचे अंतिम वाटप नावांसह निश्चित केले जाणार आहे. (BJP Maharashtra)



गेल्या अनेक महिन्यांपासून महायुतीमधील वरिष्ठ नेते, माजी आमदार आणि निष्ठावंत पदाधिकारी महामंडळांसाठी 'देव पाण्यात बुडवून' बसले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर आता आपापल्या पक्षाच्या कोट्यातून महत्त्वाच्या महामंडळाची सूत्रे हस्तगत करण्यासाठी नेत्यांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणी आणि अंतर्गत लॉबिंग सुरू केले आहे.

Comments
Add Comment

Navnath Ban : 'देवेंद्र फडणवीस लवकरच सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम करतील'; भाजपचे नवनाथ बन यांचा दावा

मुंबई :  भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत,

Train Viral Video : चक्क चालत्या ट्रेनमध्ये पूजा अर्चा! व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने दिली महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली : सोशल मीडियावर (Social Media) सध्या भारतीय रेल्वेच्या (indian Railway) एका चालत्या डब्यात धार्मिक विधी आणि पूजा केली जात

Jejuri Palkhi Accident : जेजुरी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर

पुणे : पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान झालेल्या भीषण अपघातात तीन

Sunetra Pawar : सासवड-जेजुरी मार्गावरील अपघातानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रुग्णालयात; जखमी वारकऱ्यांना दिला धीर, तातडीच्या उपचाराचे आदेश

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान सासवड–जेजुरी मार्गावर घडलेल्या भीषण अपघाताने वारकरी

Asmita Katkar death case : मुलगा होईल म्हणून कपडे घेतले आणि...; अस्मिता काटकर मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण! आई-वडिलांचे सासरच्यांवर गंभीर आरोप

कोल्हापूर : कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात एका महिन्याच्या चिमुकलीच्या आईने आत्महत्या केल्याच्या घटनेने

Ashadhi Wari Accident : जेजुरीजवळ पालखी सोहळ्यात अपघात; टेम्पोच्या धडकेत ३ वारकरी महिलांचा मृत्यू, ४ वारकरी जखमी

जेजुरी : आषाढी वारी (Ashadhi Wari) सोहळा सुरू असतानाच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी (Palkhi) मार्गावर मोठी दुर्घटना (Accident)