Navnath Ban : 'देवेंद्र फडणवीस लवकरच सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम करतील'; भाजपचे नवनाथ बन यांचा दावा

मुंबई :  भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, ते महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणारे नेते ठरतील, असा विश्वास व्यक्त केला. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Navnath Ban)



नवनाथ बन म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे नाव महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले असून, जनतेच्या पाठिंब्यामुळे भविष्यात ते अव्वल स्थान गाठतील. राज्याच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे आणि विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे त्यांना सातत्याने जनतेचा आशीर्वाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. ( CM Devendra Fadnavis)


यावेळी त्यांनी फडणवीस यांच्या कार्यकाळातील अटल सेतू, मुंबई मेट्रो, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, बीडीडी चाळ पुनर्विकास आणि शेतकरी कर्जमाफीसारख्या निर्णयांचा उल्लेख केला. तसेच विरोधकांवरही त्यांनी जोरदार टीका केली.



लाडकी बहीण योजनेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) आणि काँग्रेसवर निशाणा साधत, ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, असा दावा त्यांनी केला. निवडणुकीत दिलेले दरमहा २१०० रुपयांचे आश्वासनही सरकार पूर्ण करेल, असे ते म्हणाले.


राम मंदिराच्या मुद्द्यावरूनही त्यांनी विरोधकांवर टीका करत, समाजवादी पक्ष आणि काँग्रेससोबतची युती करताना उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. (Maharashtra Politics)


याशिवाय, शरद पवार यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केल्याचा उल्लेख करत, महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांचा पक्ष राजकीयदृष्ट्या एकटा पडत असल्याचाही दावा नवनाथ बन यांनी केला. (Politics)

Comments
Add Comment

Maharashtra Politics : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा मुहूर्त ठरला?

- ४८-२९-२२ चा फॉर्म्युला निश्चित; मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यादीवर करणार शिक्कामोर्तब मुंबई : राज्यात

Train Viral Video : चक्क चालत्या ट्रेनमध्ये पूजा अर्चा! व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने दिली महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली : सोशल मीडियावर (Social Media) सध्या भारतीय रेल्वेच्या (indian Railway) एका चालत्या डब्यात धार्मिक विधी आणि पूजा केली जात

Jejuri Palkhi Accident : जेजुरी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर

पुणे : पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान झालेल्या भीषण अपघातात तीन

Sunetra Pawar : सासवड-जेजुरी मार्गावरील अपघातानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रुग्णालयात; जखमी वारकऱ्यांना दिला धीर, तातडीच्या उपचाराचे आदेश

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान सासवड–जेजुरी मार्गावर घडलेल्या भीषण अपघाताने वारकरी

Asmita Katkar death case : मुलगा होईल म्हणून कपडे घेतले आणि...; अस्मिता काटकर मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण! आई-वडिलांचे सासरच्यांवर गंभीर आरोप

कोल्हापूर : कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात एका महिन्याच्या चिमुकलीच्या आईने आत्महत्या केल्याच्या घटनेने

Ashadhi Wari Accident : जेजुरीजवळ पालखी सोहळ्यात अपघात; टेम्पोच्या धडकेत ३ वारकरी महिलांचा मृत्यू, ४ वारकरी जखमी

जेजुरी : आषाढी वारी (Ashadhi Wari) सोहळा सुरू असतानाच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी (Palkhi) मार्गावर मोठी दुर्घटना (Accident)