मुंबई: व्हिएतनाममधील फूक्वॉक बेटाजवळ झालेल्या भीषण स्पीडबोट अपघातात जीव गमावलेल्या १५ भारतीय पर्यटकांचे पार्थिव आज, १३ जुलै रोजी रात्री भारतात आणले जात आहे. हनोई येथील भारतीय दूतावासाने यासंदर्भात अधिकृत माहिती दिली असून, संपूर्ण देशावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.
बर्मिंगहॅम: भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर असून, उद्या १४ जुलैपासून दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होत आहे. टी२० मालिकेत ...
विशेष विमानाने मुंबईत आगमन
भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व १५ मृतदेह व्हिएतनाम एअरलाईन्सच्या 'वीएन-९७९' या विशेष विमानाने हो ची मिन्ह सिटी येथून मुंबईकडे रवाना केले जाणार आहेत. हे विमान आज रात्री ९.३५ वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होईल. मुंबईत पार्थिव पोहोचल्यानंतर, तिथून ते मृतांच्या मूळ गावी पाठवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
शुटिंग संपताच रणवीर सिंग घेणार ब्रेक बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश करत आहे. ...
मृतांमध्ये तामिळनाडूतील १० पर्यटकांचा समावेश
या दुर्दैवी अपघातात प्राण गमावलेल्यांमध्ये बहुतांश तरुण पर्यटकांचा समावेश आहे. मृतांची माहिती खालीलप्रमाणे आहे:
-
तामिळनाडू: १० पर्यटक
-
आंध्र प्रदेश: ३ पर्यटक
-
केरळ: २ पर्यटक मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश असून, हनोई येथील भारतीय दूतावास आणि हो ची मिन्ह सिटीमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोसेगव्हाण येथील माळढोक (Maldhok) अधिसूचित क्षेत्रात बिबट्याचे मुंडके आणि मागील दोन पाय आढळून ...
केंद्र आणि राज्य सरकारांचा समन्वयाने प्रयत्न
पार्थिव भारतात आणल्यानंतर ते त्यांच्या नातेवाईकांपर्यंत सुखरूप पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांच्या सरकारांशी समन्वय साधला आहे. विमानतळावरून मृतदेह त्यांच्या निवासस्थानी नेण्यासाठी विशेष वाहनांची आणि इतर सर्व सोयींची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
मुंबई : राज्यातील माथाडी, हमाल आणि इतर श्रमजीवी कामगारांच्या सुरक्षा व कल्याणासाठी लागू असलेल्या विविध कामगार कायद्यांमध्ये कालसुसंगत सुधारणा ...
काय घडली होती घटना?
गेल्या शुक्रवारी व्हिएतनामच्या फूक्वॉक बेटाजवळील होन मे रुत नगोई भागात ३२ भारतीय पर्यटक आणि ४ स्थानिक क्रू मेंबर्सना घेऊन जाणारी एक स्पीडबोट समुद्रात उलटली होती. यात १५ जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सुदैवाने, १६ पर्यटकांना वेळेत वाचवण्यात यश आले असून, प्राथमिक उपचारानंतर ते भारतात परतले आहेत. एक जखमी पर्यटक अद्यापही फूक्वॉक येथील रुग्णालयात उपचार घेत असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
- ९८ वर्षांचे लीज मॉडेल; एसटीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी निर्णय मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) मोक्याच्या जागांचा आणि ...
बोट चालकावर कारवाई
या भीषण अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश व्हिएतनाम सरकारने दिले आहेत. प्राथमिक तपास आणि स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, अपघाताला जबाबदार धरून स्पीडबोटच्या चालकाला रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फूक्वॉक हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असले तरी, या घटनेने सुरक्षिततेच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.






