Food poisoning : नंदुरबारमध्ये धक्कादायक घटना! वस्तीगृहातील ५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ३ जणांची प्रकृती चिंताजनक

नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा येथील समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहात अन्नातून विषबाधा (Food poisoning) झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. रात्रीचे जेवण केल्यानंतर सुमारे 40 ते 50 विद्यार्थ्यांना अचानक मळमळ, उलट्या आणि अस्वस्थतेचा त्रास सुरू झाला. या घटनेनंतर सर्व विद्यार्थ्यांना तातडीने शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.



प्राथमिक माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी रात्रीच्या जेवणात डाळ-भात, शेवग्याची भाजी आणि चपाती खाल्ली होती. जेवणानंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांत अनेक विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागला. काही वेळातच बाधित विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने वस्तीगृहात गोंधळ उडाला आणि प्रशासनाला माहिती देण्यात आली. (Food poisoning)


घटनेची माहिती मिळताच तहसीलदार संभाजी पाटील, प्रांत अधिकारी दीपक गिरासे आणि शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात (Hospital) भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून, प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.



दरम्यान, उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी वस्तीगृहात निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यापूर्वीही अनेक वेळा अन्नाच्या गुणवत्तेबाबत तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या निष्काळजीपणामुळेच ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


घटनेनंतर वस्तीगृहाचे वॉर्डन आणि संबंधित शिक्षक वेळेवर रुग्णालयात न पोहोचल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. जबाबदार अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


सध्या सर्व विद्यार्थ्यांवर वैद्यकीय उपचार सुरू असून, तीन गंभीर विद्यार्थ्यांवर डॉक्टरांचे विशेष लक्ष आहे. तपास अहवालानंतर विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील

Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील खड्डे बुजवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; प्री-कास्ट पॅचने दुरुस्तीला सुरुवात

पुणे : चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवर आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने

Ahilyanagar Crime : गौण खनिज माफियांवर कारवाईचा हातोडा, अहिल्यानगरमधील ६३ क्रशर सील

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर तालुक्यातील खडीकरण केंद्रांवर महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. तालुक्यातील सर्व ६३

Pune RTO : पुणेकरांसाठी मोठी बातमी! ‘MH 12’ ची जागा आता ‘MH 61’ घेणार? वाहनांच्या नंबरबाबत मोठा बदल

पुणे : पुणेकरांची खास ओळख बनलेली ‘MH 12’ वाहन क्रमांक मालिका आता लवकरच संपण्याची शक्यता आहे. पुण्यात वाहनांची

Chhatrapati Sambhajinagar Suicide : 'तुला Iphone 15 Pro देतो, खाली ये बाळा'... डोंगराच्या कड्यावरून आई-वडिलांची आर्त हाक

डोंगरावर गेला, 3 तास कड्यावर उभा राहिला; उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही अंत छत्रपती संभाजीनगर :

Maharashtra Weather Alert : श्रावणसरी गायब! महाराष्ट्रावर पावसाचे संकट; पुढील काही दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज

मुंबई : ऑगस्ट महिन्याचा अर्ध्याहून अधिक कालावधी संपला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक