Shrirampur Crime : धक्कादायक! युवा उद्योजकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूरात कडकडीत बंद

तरुणाच्या हत्येनंतर पालकमंत्री विखे पाटल यांची पीडित कुटुंबाला भेट




श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील नेवासा (Nevasa) रस्त्यावरील लक्ष्मीनारायण पॅलेस हॉटेल अँड लॉजिंगचे युवा उद्योजक आकाश चंद्रशेखर (शेखर) वेंकटरमन दुबैय्या (वय ३४) यांच्या निर्घृण हत्येच्या (Murder) निषेधार्थ रविवारी श्रीरामपूर शहरात कडकडीत बंद (Shrirampur city completely shut down) पाळण्यात आला. व्यापारी, विविध सामाजिक संस्था आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी बंदला पाठिंबा देत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली.





शनिवारी दुपारी हॉटेलमध्ये जेवण उशिरा मिळाल्याच्या कारणावरून मद्यधुंद अवस्थेतील तिघांचा कर्मचाऱ्यांशी वाद झाला. वाद मिटविण्यासाठी आकाश दुबैय्या पुढे आले असता, संशयितांनी त्यांच्यावर काचेचा टी-पॉय आणि इतर वस्तूंनी जीवघेणा हल्ला केला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या हल्ल्यात त्यांचे वडील आणि चुलत भाऊ कुणाल दुबैय्या जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


 

घटनेनंतर पोलिसांनी निलेश जाधव, ओंकार डफळ आणि सुरज जाधव या तिघांना ताब्यात घेतले. निलेश जाधव हा रुग्णालयातील स्वच्छतागृहात, तर ओंकार डफळ हा रुग्णालयाच्या टेरेसवर लपून बसल्याचे तपासात समोर आले. तिन्ही संशयितांची चौकशी सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण आणि इतरांचा सहभाग होता का, याचा तपास सुरू आहे.  (Shrirampur Crime)



घटनेनंतर संतप्त नागरिकांनी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत शहरातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. आरोपींवर मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी व्यापाऱ्यांसोबत बैठक घेऊन शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याचे आश्वासन दिले.


रविवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिवंगत आकाश दुबैय्या यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. या प्रकरणातील आरोपी आणि त्यांच्या पाठीराख्यांवर कठोर कारवाई करून दुबैय्या कुटुंबाला शंभर टक्के न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. या घटनेमुळे श्रीरामपूरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Comments
Add Comment

Chhatrapati Sambhajinagar Suicide News : खवड्या डोंगर दुर्घटनेला कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी? आईच्या जुन्या व्हिडिओंमुळे नवे प्रश्न उपस्थित

छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगावजवळच्या खवड्या डोंगरावर २१ ऑगस्ट २०२६ रोजी घडलेल्या

Gadchiroli : गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे.

National Teacher Award 2026 : महाराष्ट्रातील ४ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार वितरण

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी

Jalgaon : सुप्रीम कॉलनीतील गोमांस प्रकरणानंतर महापालिकेची धडक कारवाई, अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त

Jalgaon : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव शहर महानगरपालिकेने (Jalgaon City Municipal Corporation)

CM Devendra Fadnavis : नवी मुंबई पोलिसांचे अत्याधुनिक ‘प्रहारी’ सीसीटीव्ही कमांड सेंटर कार्यान्वित; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे : नवी मुंबईकरांच्या सुरक्षिततेत अधिक भर घालत गुन्हेगारीवर नियंत्रण आणि अत्याधुनिक देखरेखीसाठी सज्ज

CM Devendra Fadnavis : नवी मुंबईत 'कॅम्पस कनेक्ट' मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रभक्तीकडे वळण्याचे आवाहन

ठाणे : व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन