मुंबई : उपवास म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर सर्वात आधी येते ती म्हणजे साबुदाणा खिचडी. मात्र प्रत्येक उपवासाला तीच तीच खिचडी खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी काही वेगळे, चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ नक्की करून पाहा. हे पदार्थ केवळ चवदारच नाहीत तर उपवासात शरीराला आवश्यक ऊर्जा देखील देतात. (Upvas Food)
1. राजगिरा थालीपीठ
उपवासासाठी राजगिरा हा उत्तम पर्याय मानला जातो. राजगिरा पीठ, बटाटा, हिरवी मिरची आणि मसाल्यांच्या मदतीने तयार केलेले थालीपीठ पोटभर आणि पौष्टिक असते. दही किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत याची चव आणखी वाढते.
2. बटाट्याची कचोरी
3. वरईची खिचडी
साबुदाण्याऐवजी वरई (भगर) वापरून तयार केलेली खिचडी हा आरोग्यदायी पर्याय आहे. यामध्ये फायबर आणि पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे उपवासातही पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
4. शिंगाड्याच्या पिठाची पुरी
उपवासाच्या दिवशी शिंगाड्याच्या पिठाची पुरी आणि बटाट्याची भाजी हा पारंपरिक आणि स्वादिष्ट पर्याय आहे. हा पदार्थ ऊर्जा देणारा असून सण-उत्सवांच्या उपवासात आवडीने खाल्ला जातो. (Upvas Food)
5. फळांची स्मूदी
उपवासात हलके आणि पौष्टिक काही खायचे असेल तर फळांची स्मूदी उत्तम पर्याय आहे. केळी, सफरचंद, ड्रायफ्रूट्स आणि दूध यापासून तयार केलेली स्मूदी शरीराला ताजेतवाने ठेवते.
6. रताळ्याचे कटलेट
रताळे हे उपवासासाठी उत्तम मानले जाते. रताळ्याचे कटलेट कमी तेलात तयार करून खाल्ल्यास चव आणि आरोग्य दोन्हींचा फायदा मिळतो.
उपवास करताना फक्त चव नाही तर शरीराला आवश्यक पोषण मिळणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे यावेळी नेहमीच्या साबुदाणा खिचडीऐवजी हे नवीन पदार्थ नक्की ट्राय करा आणि उपवासाचा आनंद घ्या. (Upvas Food)
मुंबई: पावसाळा म्हटलं की गरमागरम भजी, वडे, समोसे आणि चहाचा कप अशीच अनेकांच्या मनातली पहिली इच्छा असते. मात्र, या ऋतूमध्ये पचनशक्ती तुलनेने कमी होते आणि ...






