Nashik : कुंभमेळ्याच्या तोंडावर मोठी कारवाई! पाच साधू-महंत आखाड्यातून आजीवन हद्दपार; त्र्यंबकेश्वरच्या महंत रघुमुनींचाही समावेश

Nashik : नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) तयारीला वेग आला असतानाच धार्मिक वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आखाड्यांमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहे. श्री पंचायत बडा उदासीन आखाड्याने पाच साधू-महंतांना आजीवन हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनासह आखाडा परिषदेतील राजकारणाचीही चर्चा रंगू लागली आहे.



नेमकं काय घडलं ?


तमिळनाडूतील कांचीपुरम येथे श्री पंचायत आखाडा बडा उदासी निर्वाण यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातील संत-महंत उपस्थित होते. आखाड्याशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर संस्थेच्या परंपरा, शिस्त आणि प्रतिष्ठेला बाधा आणल्याचा आरोप असलेल्या पाच साधू-महंतांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या निर्णयानुसार संबंधित पाचही साधूंना आजीवन हद्दपार करण्यात आले असून, त्यांच्याशी सर्व धार्मिक आणि संघटनात्मक संबंध तोडण्याचा म्हणजेच पारंपरिक भाषेत 'हुक्का-पाणी बंद' करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.



कोणावर झाली कारवाई ?


या कारवाईत त्र्यंबकेश्वरचे श्रीमहंत रघुमुनी, महंत उग्रदास, जयेंद्र मुनी (कनखल), स्वामी शिवानंद (प्रयागराज) आणि सेवादास (हरिद्वार) यांचा समावेश आहे. संबंधितांनी आखाडा आणि श्री सतपंच परमेश्वर यांच्या हिताविरोधात न्यायालयासह इतर मंचांवर भूमिका घेतल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे वर्तनही आखाड्याच्या परंपरा आणि शिस्तीविरोधात असल्याचे नमूद करण्यात आले. आखाड्याचे श्री महंत दुर्गादास महाराज यांनी या निर्णयाची माहिती देताना सांगितले की, संस्थेची परंपरा, शिस्त आणि प्रतिष्ठा जपणे हे सर्वोच्च प्राधान्य आहे. भविष्यातही आखाड्याच्या हिताविरोधात कोणतीही कृती करणाऱ्यांविरोधात नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल.


या निर्णयामुळे सर्वाधिक चर्चा महंत रघुमुनी यांच्या नावाची होत आहे. काही दिवसांपूर्वीच त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या कार्यक्रमात आखाडा परिषदेच्या दुसऱ्या गटाने त्यांना बडा उदासीन आखाड्याचे प्रतिनिधी म्हणून घोषित केले होते. त्या कार्यक्रमात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्रपुरी महाराज आणि महामंत्री महंत हरीगिरी महाराज यांनी व्यासपीठावर रघुमुनी यांना स्थान देत आगामी नाशिक कुंभमेळ्यात त्यांच्या सहकार्याने बडा उदासीन आखाडा सहभागी होणार असल्याचे जाहीर केले होते.



आखाड्यांतील अंतर्गत मतभेद बाहेर


दरम्यान, आगामी सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना अशा प्रकारचा वाद समोर आल्याने धार्मिक क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. प्रशासन एका बाजूला कुंभमेळ्याच्या तयारीत व्यस्त असताना, दुसरीकडे आखाड्यांतील अंतर्गत मतभेद उफाळून आल्याने या घडामोडींकडे संत, भाविक आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे. आगामी काळात या वादावर कोणती भूमिका घेतली जाते आणि त्याचा कुंभमेळ्याच्या आयोजनावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Jalgaon : भूस्खलनामुळे 17 जुलैपर्यंत 19 गाड्यांच्या मार्गात बदल, जळगाव–पाळधी–सुरत मार्गावरून धावणार रेल्वे; मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

Jalgaon : मुंबई–पुणे रेल्वे मार्गावरील लोणावळा–कर्जत घाट विभागात झालेल्या भूस्खलनामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा

PM Narendra Modi : 'ही घटना अत्यंत दुःखद...' व्हिएतनाम बोट दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला तीव्र शोक

व्हिएतनाम : व्हिएतनाममधील 'फू क्वोक' बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटल्याची हृदयद्रावक घटना समोर

Crime News : चुलत भावासोबत मिळून केली सख्ख्या आई-वडिलांची हत्या ;

मुंबई : आपण आपल्या आई वडिलांवर खूप प्रेम करतो. त्यांना नेहमी सुखात आणि आनंदात ठेवण्यासाठी आपण दिवस रात्र कष्ट आणि

Winter Session : विधान परिषदेत विरोधकांचे संख्याबळ घटणार

हिवाळी अधिवेशनाआधी ५ आमदार निवृत्त होणार; पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकडे लक्ष मुंबई : राज्य

Ketan-Siya Case : केतन-सिया प्रकरणात मोठा ट्विस्ट! या कारणामुळे सिया-चेतन निर्दोष सुटण्याची शक्यता ?

Mumbai : पुण्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरण सध्या देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. १८ जून रोजी लोहगड

Moshi accident : १ महिन्यापूर्वी नोकरी अन् अवघ्या महिन्यांपूर्वी थाटला होता संसार; मोशी दुर्घटनेने सावंत कुटुंबाचा आधार हिरावला!

पुणे : मोशी येथील कचरा डेपोमध्ये कोसळलेल्या प्रशासकीय इमारतीच्या दुर्घटनेतील बचावकार्य अद्यापही युद्धपातळीवर