Nitesh Rane : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये 'स्वयंपूर्ण सिंधुदुर्ग' संकल्पना; मंत्री नितेश राणे यांच्या दालनात सादरीकरण

- शासकीय लाभ १०० टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार


मुंबई : केंद्र सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' आणि गोव्याच्या 'स्वयंपूर्ण गोवा' या यशस्वी उपक्रमांच्या धर्तीवर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये 'स्वयंपूर्ण सिंधुदुर्ग' ही महत्त्वाकांक्षी संकल्पना प्रभावीपणे राबविली जाणार आहे. या योजनेमुळे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ १०० टक्के पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होणार असून, जिल्हा विकासाचे एक नवे प्रारूप तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभे राहील, अशी माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिली. मंत्रालयातील त्यांच्या दालनात या संकल्पनेचे विस्तृत सादरीकरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.



'विकसित भारत २०४७' आणि 'विकसित महाराष्ट्र' या ध्येयपूर्तीसाठी शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. हेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून 'स्वयंपूर्ण सिंधुदुर्ग' अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये एक जबाबदार अधिकारी नियुक्त केला जाईल. याशिवाय, आधुनिक डिजिटल संवाद व्यवस्था आणि थेट लाभार्थी-केंद्रित अंमलबजावणीची एक मजबूत यंत्रणा गावपातळीवर उभारण्यात येणार आहे. यामुळे प्रशासकीय कामांत गतिशीलता येण्याबरोबरच शासकीय योजनांमधील पारदर्शकता वाढेल आणि प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला. (Nitesh Rane)



डिजिटल ग्रामपंचायती आणि रोजगारनिर्मितीवर भर :


- या नव्या संकल्पनेमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायती खऱ्या अर्थाने 'डिजिटल ग्रामपंचायती' म्हणून सक्षम होतील. कागदोपत्री विकास न करता, लोकसहभागातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यावर यात भर दिला जाणार आहे. गावातील स्थानिक संसाधनांचा वापर करून तिथेच नवीन रोजगारनिर्मितीला चालना देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करणे हे या उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य असणार आहे.
- मंत्रालयात पार पडलेल्या या बैठकीला सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे या दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) उपस्थित होत्या. तसेच या प्रकल्पाच्या नियोजनासाठी कैलास सावंत, सचिन सावंत, नितीन पांढरपट्टे आणि सुयोग दीक्षित आदी उपस्थित होते. (Nitesh Rane)

Comments
Add Comment

LOCAL TRAIN : हार्बरच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज! जीटीबी नगर स्थानकात लवकरच धावणार १५ डब्यांची लोकल

मुंबई: मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील वाढती गर्दी आणि प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेता प्रशासनाने एक

Cabinet Meetings : आता कॅबिनेट बैठका होणार एअर इंडियाच्या इमारतीत

२२ व्या मजल्यावर जागा; २३ व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे भव्य कार्यालय मुंबई : मंत्रालयातील गर्दी आणि जागेची

FDA : तुकाराम मुंढेंविरुद्ध अधिकाऱ्यांची मंत्री झिरवळ यांच्याकडे तक्रार

कार्यपद्धतीवर आक्षेप; २५ हून अधिक कर्मचाऱ्यांचे अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांना पत्र मुंबई : अन्न व औषध प्रशासन

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमनाची चाहूल! मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांकडून गणेशोत्सव २०२६ च्या तयारीला विधिवत सुरुवात

मुंबई : अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक

Mumbai High Court - FDA : अन्न व औषध प्रशासन विभागाने किती सरकारी कँटीनवर धाडी टाकल्या? अन्न व औषध प्रशासन मंडळाच्या धडक कारवाईवर हायकोर्टाचे ताशेरे!

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाच्या धडक कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत थेट सवाल

The Koyna Dam : कोयना धरण 'छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर' नावाने ओळखले जाणार

मुंबई : पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना जलसागराचे नामांतर "छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर" असे