Government of Maharashtra : 'आपत्तीवर वॉर मोड'! पावसाळी संकटाशी लढण्यासाठी महाराष्ट्र शासन सज्ज; मोशी, पालघरसह राज्यभर बचावकार्य वेगात

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन पूर्णपणे 'ॲक्शन मोड'वर आले आहे. राज्यभर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, जिल्हा प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग तसेच NDRF आणि SDRF यांच्या समन्वयातून युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. (Government of Maharashtra)


पुणे जिल्ह्यातील मोशी येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत बचावकार्याचा आढावा घेतला. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, दुर्घटनेत अडकलेल्या नागरिकांपैकी आतापर्यंत नऊ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून एक जण जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आला आहे. दुर्घटनेच्या वेळी इमारतीत एकूण २३ जण होते. त्यापैकी पाच जण वरच्या मजल्यावरून स्वतः बाहेर पडले, तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. उर्वरित नागरिकांच्या शोधासाठी बचावकार्य सुरू आहे. (Government of Maharashtra)



दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांनी विविध जिल्ह्यांतील परिस्थिती आणि सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. (Government of Maharashtra)


राज्यभर नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर, मदत व बचावकार्य, तसेच २४ तास कार्यरत नियंत्रण कक्षांच्या माध्यमातून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन शासनाने केले आहे.



मुंबईत सहा दिवसांत विक्रमी पाऊस :


मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत अवघ्या सहा दिवसांत कुलाबा येथे ८८२ मिमी, तर सांताक्रूझ येथे ९८८ मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या सुमारे ४२ टक्के इतका आहे. ताशी ५० ते ७५ किमी वेगाचे वारे आणि चार मीटरहून अधिक उंच भरतीमुळे परिस्थिती गंभीर झाली होती. तरीही विविध यंत्रणांनी प्रभावी समन्वय साधत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. (Government of Maharashtra)



पालघर, रायगड, ठाणे आणि पुण्यातही प्रशासन सतर्क :


पालघर जिल्ह्यात पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी पूरग्रस्त भागांना भेट देत मदतकार्याची पाहणी केली. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्य आपत्कालीन कार्य केंद्रातून रायगड, रत्नागिरी आणि इतर जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. ठाण्यातील कळवा पूर्व येथील भास्कर नगर परिसरात डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने घरे धोक्यात आली होती. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन आवश्यक उपाययोजना केल्या. त्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. (Government of Maharashtra)



पर्यटनस्थळांवर निर्बंध :


पावसाळ्यातील वाढती पर्यटकांची गर्दी आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील प्रमुख पर्यटनस्थळांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे आदेश ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत लागू राहणार आहेत. राज्यात नैसर्गिक आपत्तींचा धोका कायम असला तरी शासनाने यंत्रणा सज्ज ठेवल्यामुळे बचावकार्याचा वेग वाढला असून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Government of Maharashtra)

Comments
Add Comment

FDA : तुकाराम मुंढेंविरुद्ध अधिकाऱ्यांची मंत्री झिरवळ यांच्याकडे तक्रार

कार्यपद्धतीवर आक्षेप; २५ हून अधिक कर्मचाऱ्यांचे अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांना पत्र मुंबई : अन्न व औषध प्रशासन

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमनाची चाहूल! मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांकडून गणेशोत्सव २०२६ च्या तयारीला विधिवत सुरुवात

मुंबई : अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक

Mumbai High Court - FDA : अन्न व औषध प्रशासन विभागाने किती सरकारी कँटीनवर धाडी टाकल्या? अन्न व औषध प्रशासन मंडळाच्या धडक कारवाईवर हायकोर्टाचे ताशेरे!

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाच्या धडक कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत थेट सवाल

The Koyna Dam : कोयना धरण 'छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर' नावाने ओळखले जाणार

मुंबई : पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना जलसागराचे नामांतर "छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर" असे

Chandrashekar Bawankule : मुंबई आणि पुण्यातील २०११ पूर्वीच्या अतिक्रमणधारकांना मिळणार हक्काचे घर

वगळलेल्या भागातील बांधकामांचे सर्वेक्षण होणार; कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन मुंबई :

Junk Food Ban : शाळांच्या परिसरात हाय फॅट, हाय सॉल्ट आणि साखरयुक्त पदार्थांचा समावेश असलेल्या जंक फूडच्या विक्रीवर बंदी; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

मुंबई : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी आणि त्यांना लहान वयातच लठ्ठपणा तसेच विविध