'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने'साठी विशेष 'पूल बँक खाती' सुरू
मुंबई(Mumbai): राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणाऱ्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने प्रत्यक्ष पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेच्या निधीचे अत्यंत जलद आणि पारदर्शक पद्धतीने वितरण करण्यासाठी 'बँक ऑफ महाराष्ट्र'मध्ये विशेष 'पूल बँक खाती' उघडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या मध्यवर्ती खात्यांमध्ये शासनाचा निधी जमा होताच, अवघ्या २४ तासांच्या आत तो पात्र शेतकऱ्यांच्या वैयक्तिक कर्ज खात्यात वर्ग करणे बँकेला बंधनकारक करण्यात आले असून, योजनेची अंमलबजावणी पूर्ण होताच ही विशेष खाती तातडीने बंद करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी घेतली बैठक; सांताक्रूझ, विले पार्ले, कुर्ला येथील इमारतींचा समावेश मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ...
प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विशेष 'पूल बँक खाते' म्हणजेच अनेक उप-खाती किंवा संस्थांचा निधी एकत्र व्यवस्थापित करणारे मध्यवर्ती खाते असून, ते 'सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे' यांच्या अधिकृत नावाने सुरू केले जात आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या(Bank Of Maharashtra) मुंबई येथील 'गव्हर्मेंट बिझनेस ब्रँच'मध्ये हे खाते उघडण्यात येत असून, या एकाच मुख्य खात्याच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निधीचे नियंत्रण, संनियंत्रण आणि थेट वितरण केले जाणार आहे.
रायगड जिल्ह्यात २४ तासांत सर्वाधिक ७१.४ मिमी पावसाची नोंद मुंबई : राज्यात मान्सून सक्रिय असून यंदाच्या पावसाळ्यात 1 जून पासून राज्यात सरासरी 332 मिमी ...
शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यात कोणतीही प्रशासकीय दिरंगाई किंवा तांत्रिक अडथळे येऊ नयेत, यासाठी सरकारने अत्यंत कडक आणि कालबद्ध नियमावली तयार केली आहे. शासनाकडून या मुख्य पूल बँक खात्यामध्ये पैशांची तरतूद जमा झाल्यानंतर, बँक प्रशासनाला तो निधी पुढील २४ तासांच्या आत संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट हस्तांतरित (Direct Benefit Transfer) करावा लागणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेची आणि योजनेची अंमलबजावणी 'महाआयटी'च्या अत्याधुनिक ऑनलाईन प्रणालीद्वारे केली जाणार असल्याने, संपूर्ण प्रक्रियेत कमालीची पारदर्शकता राहणार असून मानवी हस्तक्षेपाला किंवा भ्रष्टाचाराला कोणताही वाव राहणार नाही.
४० हजार नागरिकांच्या लाभ; १९८९ च्या रेडी रेकनरच्या अवघ्या अडीच टक्के शुल्कात मिळणार मालकी हक्क मुंबई(Mumbai) : सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील कामगार ...
या विशेष पूल बँक खात्याचा वापर केवळ आणि केवळ 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' च्या अंतर्गत येणाऱ्या व्यवहारांसाठीच करणे कायद्याने बंधनकारक आहे. अन्य कोणत्याही शासकीय, विभागीय किंवा खासगी उद्देशासाठी या खात्यातील निधी वापरण्यास किंवा इतर व्यवहारांसाठी हे खाते वापरण्यास सरकारकडून सक्त मनाई करण्यात आली आहे. या योजनेचा शेवटचा व्यवहार पूर्ण होताच, म्हणजेच राज्यातील अंतिम पात्र शेतकऱ्यापर्यंत कर्जमाफीचा लाभ पोहोचताच हे तात्पुरते पूल बँक खाते तातडीने बंद करण्याचे आदेश सहकार विभागाने जारी केले आहेत.






