मुंबई : मुंबईत (Mumbai) सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या चार दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर कायम असून अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department - IMD) आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert), तर रायगडसाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे.
पुढील ७२ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील ७२ तासांत मुंबई, कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः मुंबईतील काही भागांमध्ये पुढील २४ तासांत २०० मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईत पहाटेपासून संततधार
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ आणि वांद्रे परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली असून सकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. काही ठिकाणी लोकल (Local) रेल्वे सेवेलाही विलंब होत असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे.
मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील कुर्ला खैरानी रोडवरील मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा एकदा मॅनहोल्समधील दुघर्टनांचा ...
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
प्रशासन आणि हवामान विभागाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच सखल भाग, नदी-नाले आणि समुद्रकिनाऱ्याजवळ जाणे टाळावे, असेही सांगण्यात आले आहे.
आजही ऑरेंज अलर्ट (Orange Alert)
मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत आजही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राज्यातील अनेक भागांत ७ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
२ ते ३ जुलैदरम्यान (सकाळी ५ ते ६) झालेली पावसाची नोंद
मलबार हिल – १४६ मिमी
फोर्ट – १३९ मिमी
अंधेरी – १३६ मिमी
वर्सोवा – १२९ मिमी
पवई – १२४ मिमी
मानखुर्द – ११८ मिमी
भांडुप – ११६ मिमी
मुलुंड – ११५ मिमी





