India vs Sri Lanka : भारतीय संघ पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार

नवी दिल्ली : भारतीय संघ पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पहिला सामना १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान गॉल येथे खेळला जाईल. दुसरा कसोटी सामना २३ ते २७ ऑगस्ट दरम्यान सिंहलीज स्पोर्ट्स(Sinhalese Sports)क्लबमध्ये खेळला जाईल. २०२५-२७ च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने भारतीय संघासाठी ही एक महत्त्वपूर्ण मालिका आहे.



भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी सामना खेळून जिंकला आहे. भारताची अलीकडील कसोटी कामगिरी खराब राहिली आहे. यामुळेच संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, श्रीलंका भारतापेक्षा एक स्थान खाली सहाव्या क्रमांकावर आहे. २०२७ मध्ये डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला आपले उर्वरित बहुतेक कसोटी सामने जिंकावे लागतील.


भारत २०१७ नंतर प्रथमच कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. यापूर्वी, दोन्ही क्रिकेट मंडळांनी या दौऱ्यात तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश करण्याच्या शक्यतेवर चर्चा केली होती. पण टी२०(T20) आंतरराष्ट्रीय मालिकेचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे, सध्या केवळ दोन कसोटी सामन्यांची मालिकाच निश्चित मानली जात आहे.



आतापर्यंत दोन्ही संघ ४६ कसोटी सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. यापैकी भारताने २२ कसोटी सामने जिंकले आहेत, तर सात सामने अनिर्णित राहिले आहेत. १७ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. भारत २०१७ नंतर प्रथमच कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. यापूर्वी, दोन्ही क्रिकेट मंडळांनी या दौऱ्यात तीन टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश करण्याच्या शक्यतेवर चर्चा केली होती. या फॉरमॅटमध्ये दोन्ही संघ शेवटचे २०२१ - २२ मध्ये एकमेकांसमोर आले होते. भारताने श्रीलंकेला २-० ने पराभूत केले होते. भारताने श्रीलंकेविरुद्ध सलग पाच कसोटी मालिका जिंकल्या आहेत. त्यामुळे, भारतीय संघ विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आ

Comments
Add Comment

Sachin Siwach : राष्ट्रकुल खेळ २०२६: भारतीय बॉक्सर सचिन सिवाच 'राऊंड ऑफ १६' मध्ये

ग्लासगो : भारताचा स्टार बॉक्सर सचिन सिवाचने शनिवारी पुरुषांच्या ६० किलो वजनी गटाच्या 'राऊंड ऑफ १६' मध्ये प्रवेश

Common Wealth Games 2026 : पुन्हा डोपिंग प्रकरण, दहा दिवसांत चौथी घटना; भारताला बसला मोठा फटका

मुंबई : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ साठी भारताने १२६ जणांच्या संघाची घोषणा केली. पण भारताच्या अडचणी वाढत असल्याचे चित्र

IND VS ZIM : हरारेमध्ये ईशान किशनचे वादळ, झिम्बाब्वेसमोर २२० धावांचं लक्ष्य

हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना हरारे येथे सुरू आहे. या

Ind VS Zim : झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकत दिला भारताला दुहेरी धक्का ! अभिषेक आणि वैभव पॉवर प्ले संपण्यापूर्वी बाद

हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना हरारे येथे खेळवला जात आहे. या

Abhishek vs Vaibhav In T20 : अभिषेक की वैभव टी-२० चा खरा बादशाह कोण? आकडेवारी काय सांगते, जाणून घेऊया

मुंबई : अभिषेक आणि वैभव या दोघांपैकी टी-२० मध्ये सर्वात स्फोटक फलंदाज कोण? याची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात

Prime Minister Modi : पंतप्रधान मोदींकडून पॉवरलिफ्टर झंडू कुमारचे कांस्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन

नवी दिल्ली : भारताने २०२६ च्या राष्ट्रकुल खेळांच्या दुसऱ्या दिवसाचा शेवट एका पदकासह आणि अनेक दमदार कामगिरींसह