India vs Sri Lanka : भारतीय संघ पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार

नवी दिल्ली : भारतीय संघ पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पहिला सामना १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान गॉल येथे खेळला जाईल. दुसरा कसोटी सामना २३ ते २७ ऑगस्ट दरम्यान सिंहलीज स्पोर्ट्स(Sinhalese Sports)क्लबमध्ये खेळला जाईल. २०२५-२७ च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने भारतीय संघासाठी ही एक महत्त्वपूर्ण मालिका आहे.



भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी सामना खेळून जिंकला आहे. भारताची अलीकडील कसोटी कामगिरी खराब राहिली आहे. यामुळेच संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, श्रीलंका भारतापेक्षा एक स्थान खाली सहाव्या क्रमांकावर आहे. २०२७ मध्ये डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला आपले उर्वरित बहुतेक कसोटी सामने जिंकावे लागतील.


भारत २०१७ नंतर प्रथमच कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. यापूर्वी, दोन्ही क्रिकेट मंडळांनी या दौऱ्यात तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश करण्याच्या शक्यतेवर चर्चा केली होती. पण टी२०(T20) आंतरराष्ट्रीय मालिकेचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे, सध्या केवळ दोन कसोटी सामन्यांची मालिकाच निश्चित मानली जात आहे.



आतापर्यंत दोन्ही संघ ४६ कसोटी सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. यापैकी भारताने २२ कसोटी सामने जिंकले आहेत, तर सात सामने अनिर्णित राहिले आहेत. १७ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. भारत २०१७ नंतर प्रथमच कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. यापूर्वी, दोन्ही क्रिकेट मंडळांनी या दौऱ्यात तीन टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश करण्याच्या शक्यतेवर चर्चा केली होती. या फॉरमॅटमध्ये दोन्ही संघ शेवटचे २०२१ - २२ मध्ये एकमेकांसमोर आले होते. भारताने श्रीलंकेला २-० ने पराभूत केले होते. भारताने श्रीलंकेविरुद्ध सलग पाच कसोटी मालिका जिंकल्या आहेत. त्यामुळे, भारतीय संघ विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आ

Comments
Add Comment

FIFA WORLDCUP 2026 : 'रेड कार्ड'मुळे डॉमिनोज चे ९.५ कोटींचे फ्री पिझ्झा वाटप!

फिफा वर्ल्ड कप २०२६ सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, या स्पर्धेतील केवळ खेळाचा थरारच नाही, तर एका

Abhishek Sharma : अभिषेक शर्माने रचला इतिहास ! फक्त ७८५ चेंडूंत केला मोठा विक्रम

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द झाला. मात्र, संघाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज

श्रेयस अय्यरची ऐतिहासिक कामगिरी! इंग्लंडमध्ये अर्धशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार

चेस्टर-ले-स्ट्रीट : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला

FIFA WORLDCUP 2026 : शिस्तभंगाच्या कारवायांचा विक्रम; लाल कार्डांचा आकडा १२ वर!

फुटबॉल जगतात शिस्तीचे कडक धोरण: २०२६ च्या फिफा विश्वचषकात पंचांनी अत्यंत कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

FIFA WORLDCUP 2026 : चॉकलेट ॲव्हेन्यू ते वर्ल्ड कप, हर्शेल, पेनसिल्व्हेनियाने ख्रिश्चन पुलिसिकला कसे घडवले?

हर्शेल: हर्शेल हे शहर आपल्या चॉकलेट उत्पादनांमुळे 'पृथ्वीवरील सर्वात गोड ठिकाण' (Sweetest Place on Earth) म्हणून ओळखले जाते.

IND vs ENG T20 : पावसाचा खेळ! भारत-इंग्लंड पहिला टी-२० सामना रद्द

डरहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-२० (T20) सामना मुसळधार पावसामुळे रद्द (Cancelled) करण्यात आला. भारतीय संघाचा (Team