नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे. दरम्यान, नैऋत्य मान्सून पुढील दोन ते तीन दिवसांत दिल्लीसह हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने मंगळवारी सांगितले.
पाणीचोरी रोखण्यासाठी सरकारची विशेष मोहीम - मंत्री सामंत मुंबई : मुंबई शहरातील पाणीटंचाई आणि पाणीचोरीच्या समस्येवर आज विधान परिषदेत गंभीर चर्चा झाली. ...
देशात जून महिन्यात सरासरी १६५.३ मिमी पावसाची अपेक्षा असताना केवळ ९९.५ मिमी पाऊस झाला आहे, जो सरासरीपेक्षा ३९.८ टक्क्यांनी कमी आहे. देशातील ३६ हवामान उपविभागांपैकी २४ उपविभागांत (६५ टक्के) पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे, तर तीन उपविभागांत (१० टक्के) अत्यंत कमी पाऊस झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून १६ मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर पोहोचला होता. केरळमध्ये मान्सूनचे आगमन ४ जून रोजी झाले, जे सामान्य तारखेपेक्षा (१ जून) तीन दिवस उशिरा होते. मंगळवारपर्यंत नैऋत्य मान्सूनने आग्नेय आणि ईशान्य भारत, मध्य भारताचे अनेक भाग आणि वायव्य भारताच्या काही भागांत प्रगती केली आहे.
जून २०२६ मध्ये कोणतेही 'लो-प्रेशर सिस्टम' तयार झाले नाही. पश्चिम पॅसिफिकवरील चक्रीवादळामुळे हिंद महासागर क्षेत्रात पावसाची तीव्रता कमी राहिली. 'एल निनो'च्या विकासामुळे भारतीय मान्सूनवर नकारात्मक परिणाम झाला आहे.
कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश महिंद्रा लॉजिस्टिक्समधील कामगारांच्या मागण्यांबाबत बैठक मुंबई : मे. महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड, चाकण ...
इंडियन ओशन डायपोल सध्या 'न्यूट्रल' (तटस्थ) स्थितीत असल्याने, तो 'एल निनो'च्या नकारात्मक परिणामांची भरपाई करू शकला नाही.
'एल निनो'च्या स्थितीचा प्रभाव २०२६ च्या उर्वरित मान्सून हंगामातही राहण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात देशाच्या बहुतांश भागांत सामान्यपेक्षा कमी पाऊस राहण्याचा अंदाज आहे. मात्र, वायव्य आणि ईशान्य भारत, पूर्व-मध्य भारत आणि पूर्व द्वीपकल्पीय प्रदेशांत सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.