Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम


गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान घातले असून आसाम आणि अरुणाचल प्रदेशात पूर व भूस्खलनामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आसाममध्ये नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. या महापुरामुळे सुमारे २२ हजार नागरिकांना घरे सोडावी लागली असून रस्ते, पूल, शेती आणि घरे जलमय झाली आहेत. (Assam Rain)



६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम :


आसाममधील धेमाजी जिल्ह्यातील अर्चीपाथर आणि सिमेन स्थानकांदरम्यानचा १९६५ मध्ये बांधलेला महत्त्वाचा रेल्वे पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. मुसळधार पाऊस आणि नदीकाठावरील तीव्र धूप यामुळे पुलाचा पाया कमकुवत झाल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेने दिली आहे. धेमाजी जिल्ह्यात अवघ्या २४ तासांत ११० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून या दुर्घटनेमुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून काही मार्गांवरील सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. (Assam Rain)



अमित शाहांनी घेतली परिस्थितीची माहिती :


पूरस्थिती गंभीर होत असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. राज्यातील मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेत केंद्र सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. (Assam Rain)



अरुणाचलमध्ये १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला : 


दरम्यान, शेजारील अरुणाचल प्रदेशातही मुसळधार पावसामुळे भीषण पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक रस्ते आणि पूल वाहून गेल्याने राज्यातील १२ जिल्ह्यांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला आहे. लोअर दिबांग व्हॅली जिल्ह्यातील सिसिरी नदीच्या पात्रात अडकलेल्या चार जणांची भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने सुखरूप सुटका करण्यात आली. प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. (Assam Rain)



देशभरात जून महिना ठरला १४६ वर्षांतील सर्वाधिक कोरड्यांपैकी एक : 


एकीकडे ईशान्य भारतात पावसाने हाहाकार माजवला असताना, देशाच्या इतर अनेक भागांत मात्र मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, यंदाचा जून महिना गेल्या १४६ वर्षांतील सर्वाधिक कोरड्या जून महिन्यांपैकी एक ठरला आहे. देशभरात जूनमध्ये सरासरीपेक्षा ४० टक्के कमी पाऊस झाला, तर मध्य भारतात ही तूट तब्बल ६० टक्क्यांपर्यंत पोहोचली. मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील अनेक भागांत मान्सूनचा वेग मंदावल्याने शेतीवर मोठा परिणाम झाला असून शेतकरी चिंतेत आहेत. (Assam Rain)


हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. मात्र ईशान्य भारतात अतिवृष्टीचा धोका कायम असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Assam Rain)

Comments
Add Comment

Char Dham Yatra : चार धाम यात्रा तात्पुरत्या स्थगितीनंतर पुन्हा सुरू

नवी दिल्ली : यात्रेच्या मार्गांचा सखोल आढावा घेतल्यानंतर, २० जुलै रोजी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरती स्थगित

NEW DELHI : आमच्यावर विटा आणि कुंडी फेकून मारल्या , जखमी दिल्ली पोलिसांनी दिली माहिती

नवी दिल्ली : संसदेजवळ झालेल्या हिंसाचारादरम्यान आंदोलकांनी जवळच असलेल्या एका संरचनेचा काही भाग तोडून विटा गोळा

Urea Production : युरिया उत्पादनात देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल, खासदार अशोक चव्हाणांच्या प्रश्नाला केंद्राचे उत्तर

नवी दिल्ली : शेती आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या युरिया उत्पादनाबाबत एक महत्त्वाची बातमी आहे.

Russian Missile Attack : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ४ भारतीय खलाशांचा मृत्यू; भारताचा संताप, रशियन राजदूतांना समन्स

नवी दिल्ली : युक्रेनच्या किनारपट्टीजवळील व्यापारी मालवाहू जहाजावर झालेल्या रशियन हल्ल्यात चार भारतीय खलाशांचा

Kangana Ranaut On CJP : 'आम्ही संसदेत कैदेत असल्यासारखे अडकलो होतो'; दिल्लीतील हिंसक आंदोलनावर खासदार कंगना रनौत यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : सोमवारी सकाळी दिल्लीच्या मध्यभागी हजारो आंदोलकांनी संसदेच्या दिशेने मोर्चा वळवला. हा मोर्चा

IIT Roorkee : 'राजकीय आंदोलनांना सोशल मीडियावर पाठिंबा देऊ नका'; IIT च्यामोठ्या निर्णयाची देशभरात चर्चा

रुडकी : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) रुडकीने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी जारी केलेल्या एका अंतर्गत