Maharashtra Monsoon Update : मुंबईत मुसळधार, कोकणात ऑरेंज अलर्ट! राज्यातील २३ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; पुढील ३ दिवस हवामान कसं असेल?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. मुंबई, उपनगरांसह कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली असून राज्यातील अनेक भागांत पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Monsoon Update)



मुंबई, ठाणे आणि उपनगरात मुसळधार पाऊस :


मंगळवारी सकाळपासून मुंबई आणि पूर्व उपनगरात पावसाचा जोर वाढला आहे. घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, पवई, कांजूरमार्ग आदी भागांत जोरदार सरी कोसळत असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Maharashtra Monsoon Update)



कोकणात पुढील काही तास महत्त्वाचे :


कोकण विभागात मान्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता असून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (Maharashtra Monsoon Update)



विदर्भात काही भागात पाऊस, काही ठिकाणी कोरडे हवामान :


विदर्भातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांत आजही कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. मात्र अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Monsoon Update)



मराठवाड्यातही पावसाचा इशारा :


मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra Monsoon Update)



नागपूरमध्ये पावसाने घेतली उसंत; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट :


नागपूर जिल्ह्यात जूनच्या तिसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर कुही, भिवापूर आणि उमरेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापूस व सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पावसाने अचानक उसंत घेतल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे हजारो रुपयांचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांच्या माथी पडला आहे. (Maharashtra Monsoon Update)


दरम्यान, ३० जून रोजी नागपूर शहरात झालेल्या मध्यम ते जोरदार पावसानंतर अनेक रस्त्यांवर पाणी साचले. विशेष म्हणजे महापालिकेच्या सिव्हिल लाईन्स येथील मुख्यालयाच्या परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मान्सूनपूर्व नालेसफाई आणि स्वच्छता मोहिमेच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.



हिंगोलीत उशिरा सुरू झाल्या खरीप पेरण्या :


हिंगोली जिल्ह्यात यंदा जूनअखेरपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगाम उशिरा सुरू झाला. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर मात्र शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला आहे. जिल्ह्यात यंदा सुमारे ४.०७ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होणार असून ट्रॅक्टर, पेरणी यंत्रे आणि बैलजोडीच्या सहाय्याने शेतात लगबग सुरू आहे. मात्र पेरणी उशिरा झाल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. आगामी काळात नियमित पाऊस झाल्यास पिकांची उगवण चांगली होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. (Maharashtra Monsoon Update)

Comments
Add Comment

Thailand Job Scam News: प्लिज..! आम्हाला वाचवा; थायलंडमध्ये अडकलेल्या तरुणांचे बेहाल, नेमकं काय प्रकरण?

महाराष्ट्रातील ३० जण गोल्डन ट्रँगलच्या जाळ्यात? परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून

Farm Loan Waiver : ५ जुलैपासून शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार

- कृषीमंत्री दत्ता भरणे; ५६ लाख २४ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ मुंबई : राज्यातील बहुप्रतीक्षित शेतकरी

Ketan Agarwal Murder : एका पँटने उघडलं केतनच्या हत्येचं गुपित, चेतनच्या कपड्यांवरून तपासाला नवे वळण

पुणे :  पुण्यातील (Pune) उद्योगपती केतन अग्रवाल हत्या (Ketan Agarwal Murder) प्रकरणात तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर

Nasrapur Rape Case : नसरापूर बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या फाशीची तत्काळ अंमलबजावणी करा

५५ दिवसात दोषारोप सिद्ध करून आरोपीला फाशीची शिक्षा दिल्याबद्दल शिवसेना महिला आघाडीकडून महायुती सरकार, पोलीस

Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पावशीजवळ कार-पिकअपची समोरासमोर धडक

भीषण अपघातात चालक गंभीर जखमी  सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर पावशी (Pawashi) येथील बेल

TET Exam : टीईटी पेपरफुटीप्रकरणी दोषींवर ‘मकोका’ लावणार; पुढील वर्षापासून परीक्षा ऑनलाईन!

विधानपरिषदेत शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे महत्त्वपूर्ण निवेदन मुंबई : महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता