रायगड : किल्ले रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने रायगडावर नवीन रोपवे उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्यामुळे भविष्यात रोपवेने प्रवास करणे अधिक स्वस्त होणार आहे. सध्या प्रतिव्यक्ती सुमारे ३५० रुपये मोजावे लागणारे तिकीट नवीन व्यवस्थेनंतर ५० ते १०० रुपयांच्या दरम्यान ठेवण्याचा शासनाचा विचार आहे. या निर्णयामुळे रायगडावर जाणाऱ्या पर्यटकांना आणि शिवभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुणे : पुण्यातील (Pune) उद्योजक केतन अग्रवाल हत्या (Ketan Agrawal Murder) प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू असून पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात महत्त्वाचे पाऊल उचलले ...
सध्या रायगडावरील खासगी रोपवेचे तिकीट अनेकांसाठी महाग असल्याने अनेक शिवभक्त गडावर पायी चढाई करतात. नवीन रोपवे सुरू झाल्यानंतर कमी खर्चात आणि कमी वेळेत गडावर पोहोचणे शक्य होणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह सर्व वयोगटातील पर्यटकांना याचा फायदा होईल.
महाराष्ट्र शासनाच्या या प्रकल्पाला पुरातत्त्व विभागाची मान्यता मिळाली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. नवीन अत्याधुनिक रोपवे सुरू झाल्यानंतर रायगडावरील पर्यटनाला चालना मिळेल, तसेच शिवभक्तांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या हाताला काम देणाऱ्या आणि त्यांच्या ...
रायगड विकास प्राधिकरणाच्या माहितीनुसार, सध्या खासगी रोपवेमार्फत प्रतिव्यक्ती सुमारे ३२५ रुपये भाडे आकारले जाते. याशिवाय गडावरील संवर्धनासाठी नेण्यात येणाऱ्या साहित्यावरही प्रतिकिलो शुल्क आकारले जात असल्याने विकासकामांचा खर्च वाढतो. नवीन सरकारी रोपवे सुरू झाल्यानंतर हा अतिरिक्त खर्च कमी होण्यास मदत होणार असून गडावरील संवर्धनाची कामेही अधिक वेगाने करता येतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.