Raigad Ropeway: रायगडावर जाणे होणार स्वस्त! रोपवेचे तिकीट ३५० रुपयांवरून ५०-१०० रुपयांपर्यंत कमी होणार

रायगड : किल्ले रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने रायगडावर नवीन रोपवे उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्यामुळे भविष्यात रोपवेने प्रवास करणे अधिक स्वस्त होणार आहे. सध्या प्रतिव्यक्ती सुमारे ३५० रुपये मोजावे लागणारे तिकीट नवीन व्यवस्थेनंतर ५० ते १०० रुपयांच्या दरम्यान ठेवण्याचा शासनाचा विचार आहे. या निर्णयामुळे रायगडावर जाणाऱ्या पर्यटकांना आणि शिवभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.



सध्या रायगडावरील खासगी रोपवेचे तिकीट अनेकांसाठी महाग असल्याने अनेक शिवभक्त गडावर पायी चढाई करतात. नवीन रोपवे सुरू झाल्यानंतर कमी खर्चात आणि कमी वेळेत गडावर पोहोचणे शक्य होणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह सर्व वयोगटातील पर्यटकांना याचा फायदा होईल.


महाराष्ट्र शासनाच्या या प्रकल्पाला पुरातत्त्व विभागाची मान्यता मिळाली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. नवीन अत्याधुनिक रोपवे सुरू झाल्यानंतर रायगडावरील पर्यटनाला चालना मिळेल, तसेच शिवभक्तांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.



रायगड विकास प्राधिकरणाच्या माहितीनुसार, सध्या खासगी रोपवेमार्फत प्रतिव्यक्ती सुमारे ३२५ रुपये भाडे आकारले जाते. याशिवाय गडावरील संवर्धनासाठी नेण्यात येणाऱ्या साहित्यावरही प्रतिकिलो शुल्क आकारले जात असल्याने विकासकामांचा खर्च वाढतो. नवीन सरकारी रोपवे सुरू झाल्यानंतर हा अतिरिक्त खर्च कमी होण्यास मदत होणार असून गडावरील संवर्धनाची कामेही अधिक वेगाने करता येतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे