Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार


मुंबई : गरिबांच्या हाताला काम देणाऱ्या आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचे हक्काचे साधन असलेल्या ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेला’ (मनरेगा) भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याचे समोर आले आहे. राज्यातील सहा प्रमुख जिल्ह्यांमधील तब्बल ४८ ग्रामपंचायतींमध्ये ‘मनरेगा’अंतर्गत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि अनियमितता झाल्याची कबुली रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे.



आमदार अशोकराव माने(Ashokrav Mane) आणि संतोष दानवे(Santosh Danve) यांनी तारांकित प्रश्नाद्वारे राज्यातील रोजगार हमी योजनेतील या घोटाळ्याकडे सरकारचे लक्ष वेधले. छत्रपती संभाजीनगर, अमरावती, पालघर, धाराशिव, अहिल्यानगर आणि नागपूर या सहा जिल्ह्यांतील ४८ ग्रामपंचायतींमध्ये मार्च २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘कॅग’च्या अहवालात हा भ्रष्टाचार उघड झाला होता. त्याबाबत मंत्री भरत गोगावले यांनी छापील उत्तर दिले. विशेष म्हणजे यात मजुरांच्या प्रत्यक्ष कामाचे हजेरीपट आणि संगणकीय हजेरीपट (Mastar)) यामध्ये जाणीवपूर्वक तफावत दाखवून शासकीय निधीचा डल्ला मारण्यात आला आहे.



छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गेवराई (कुबेर) येथे १५६ दिवसांऐवजी १८६ दिवसांची मक्तेदारी दाखवण्यात आली. एकाच कुटुंबप्रमुखाच्या नावाने अनेक बोगस व दुबार जॉब कार्ड्स तयार करून लाखो रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. तर, अमरावती जिल्ह्यातील इटकी शिवार (बु.), हिंगणी आणि मिर्झापूर या ग्रामपंचायतींमध्ये १०२ मजुरांच्या नावे अतिरिक्त मजुरी लाटल्याचा प्रकार समोर आणला. पालघरमधील 'येती वरोटी' येथे रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करून शासकीय निधी लाटण्यात आला.


दोषींना कारणे दाखवा नोटिसा


याविषयी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिलेल्या छापील उत्तरानुसार, अमरावती जिल्ह्यातील मिर्झापूर प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने 'कारणे दाखवा' (Show-cause) नोटीस बजावण्यात आली असून पुढील दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Election : मतदार यादी पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम यादी १९ ऑक्टोबरला

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाचे

Firoz Baba Case : फिरोज बाबा प्रकरणात तपासाची गती; ठाणे पोलिसांकडून पाच जणांना समजपत्र

ठाणे : फिरोज बाबा प्रकरणातील तपासाला वेग आला असून, ठाकरे शिवसेनेचे (Shevsena) माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ

Dhule Crime News : कंपनीवर 'हा' मोठा आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवत म्हणाला...

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील गिधाडे तापी नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

Tribal Reservation : धर्मांतर केलेल्या आदिवासींच्या सवलती बंद होणार?

- राज्य सरकार ऍक्शन मोडवर; सर्वसमावेशक धोरणासाठी २७ जणांची समिती मुंबई : धर्मांतरानंतरही अनुसूचित जमातीचे

Nanded Suicide : स्टेटस ठेवलं अन् शिक्षकाची दोन मुलांसह आत्महत्या; पोलीस तपास सुरु

नांदेडमध्ये शिक्षकाची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या; व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे खळबळ नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातून