Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ; ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती : समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली  आहे. महामार्ग जेवढा सोईस्कर आणि सुखकर आहे तेवढाच जास्त तो घातक ठरत आहे. गेल्या आठवडाभरात विविध जिल्ह्यात झालेल्या अपघातात अनेक  प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यातील अपघातांच्या घटना काही केल्या कमी होताना दिसून येत नाही. अशातच आज पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर(Samruddhi Mahamarg) भीषण अपघातझाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.



कसा झाला अपघात ?


अमरावती(Amravati) जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात समृद्धी महामार्गावर एक चार चाकी वॅगनार कार आणि ट्रक यांच्यात मोठी धडक झाली. चंद्रपूरहून मुंबईच्या(Chandrapur-mumbai)) दिशेने निघालेल्या वॅगनार कारने पुढे जात असलेल्या भरधाव ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारचा अक्षरशः चुरा झाला असून कारमधील सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. चैनल क्रमांक १०५ जवळ हा भीषण अपघात झाला.



एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू


या दुर्दैवी अपघातात मृत्यू झालेल्या पाचही जणांचा एकाच कुटुंबाशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तसेच समृद्धी महामार्गावरील बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सर्व मृतदेहांना बाहेर काढण्यात आले आणि रुग्णालयात पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या अपघाताबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.


वाहतूक मंदावली


या भीषण अपघातानंतर समृद्धी महामार्गावर काही काळ वाहतूककोंडीची परिस्थिती निर्माण झाली. अपघातग्रस्त वाहन आणि ट्रक यामुळे वाहतूक विस्कळीत  झाली मात्र वाहतूक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आवश्यक कार्यवाही सुरू केली. त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीतपणे सुरु झाली.

Comments
Add Comment

Fairness Cream : धक्कादायक! गोरं करणारी क्रीम ठरतेय धोकादायक; क्रीम वापरल्याने होतोय कायमचा किडणी किंवा गंभीर त्वचाविकार

- डॉक्टरांनी महत्वाची बातमी Fairness Cream : गोरं दिसण्याच्या हव्यासापोटी फेयरनेस क्रीमचा सर्रास वापर करणाऱ्यांसाठी

Raigad Ropeway: रायगडावर जाणे होणार स्वस्त! रोपवेचे तिकीट ३५० रुपयांवरून ५०-१०० रुपयांपर्यंत कमी होणार

रायगड : किल्ले रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने रायगडावर नवीन रोपवे

Ketan Agrawal Murder Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट; लोहगडावर सिया गोयलकडून पोलिसांनी केले सीन रिक्रिएशन

पुणे : पुण्यातील (Pune) उद्योजक केतन अग्रवाल हत्या (Ketan Agrawal Murder) प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू असून पुणे ग्रामीण

Rajgad Accident : राजगडाच्या वाटेवर भीषण अपघात! पाबे घाटात मिनी बस २५ फूट दरीत कोसळली; दोन पर्यटकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

पुणे : किल्ले राजगड (Rajgad Fort) येथे पर्यटनासाठी (Tourism) निघालेल्या मुंबईतील अंधेरी येथील पर्यटकांच्या मिनी बसचा (Mini Bus) पुणे

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो