बीड: परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील २५ तरुणांची मानवी तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. थायलंड आणि म्यानमार सीमेवरील कुख्यात 'गोल्डन ट्रँगल' परिसरात या तरुणांना ओलीस ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले जात आहेत. बीडमधील एका पीडित तरुणाने जीवावर उदार होऊन केलेल्या फोनमुळे या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.
इंग्लंड खेळाडूंकडून मिळाला 'गार्ड ऑफ ऑनर' लंडन : टी-२० महिला वर्ल्ड कप २०२६ मध्ये शनिवारी (२७ जून) ला गविजेता न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात उपांत्या ...
काय आहे प्रकरण?
चांगल्या पगाराच्या नोकरीच्या आमिषाला बळी पडून महाराष्ट्रातील विविध भागांतील २५ तरुण थायलंड आणि म्यानमारला गेले होते. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर त्यांना प्रत्यक्षात म्यानमार-थायलंड-लाओस सीमावर्ती भागात असलेल्या 'गोल्डन ट्रँगल' परिसरात डांबून ठेवण्यात आले आहे.
उत्तर प्रदेश: गेल्या २४ तासांत उत्तर प्रदेश पोलीस आणि विशेष कृती दलाने (STF) राज्यभरात धडक कारवाई करत गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडले आहे. लखनौ, बहराइच, ...
तरुणांचे हाल आणि भीषण वास्तव
पीडित तरुणांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटचे स्वरूप अत्यंत भयानक आहे:
सक्तीचे काम: बंदुकीच्या धाकावर या तरुणांकडून दिवसाला १८ ते १९ तास ऑनलाइन फसवणुकीचे काम (सायबर फ्रॉड) करून घेतले जाते.
अमानुष छळ: काम करण्यास नकार दिल्यास किंवा टार्गेट पूर्ण न झाल्यास त्यांना बेदम मारहाण करणे, विजेचे शॉक देणे आणि अमानुष छळ करणे असे प्रकार घडत आहेत.
दुर्दैवी स्थिती: परदेशात मोठ्या पगाराची नोकरी मिळण्याचे सोडा, पण तिथे आता त्यांना दोन वेळच्या अन्नासाठीही संघर्ष करावा लागत आहे.
पुणे : पुण्यातील (Pune) उद्योजक केतन अग्रवाल हत्या (Ketan Agrawal Murder) प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू असून पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात महत्त्वाचे पाऊल उचलले ...
बीड सायबर पोलिसांची कारवाई
बीडमधील एका तरुणाने मोठ्या धैर्याने आपल्या कुटुंबीयांना फोन करून ही परिस्थिती सांगितली. या माहितीच्या आधारे बीड सायबर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून, या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा तपास सुरू केला आहे. बीड पोलिसांच्या या कारवाईमुळे या मानवी तस्करीच्या गंभीर प्रकारावर प्रकाश पडला आहे.
अवैध मार्गाने किंवा आमिषांना बळी पडून परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या तरुणांसाठी ही घटना एक मोठा इशारा आहे. सध्या या तरुणांची सुटका करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे.