Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था


३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था


मुंबई  : मुंबई महापालिकेचे सध्याचे ब्रिटिशकालीन सभागृह नगरसेवक, अधिकाऱ्यांसाठी अपुरे पडत असल्याने नवे सभागृह उभारण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्याच्या मुख्यालयासमोरील जिमखान्याच्या जागी चार मजली इमारत उभारली जाणार असून त्यात वरच्या मजल्यावर हे सभागृह साकारण्याचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे.३५० क्षमता, नगरसेवक (Corporator),अधिकारी (Officer), पत्रकारांसाठी व्यवस्था, विविध सुविधांनी युक्त असे हे सभागृह असेल. ऑगस्टमध्ये कामाचे भूमिपूजन करण्याचे नियोजन आहे. नवे सभागृह उपलब्ध होताच, जुन्या ऐतिहासिक वास्तू असलेल्या सभागृहाचा वापर महापौरांच्या बैठकीसाठी करण्याचे नियोजनही आहे. सध्याच्या सभागृहात २२७ नगरसेवक आणि दहा स्वीकृत नगरसेवकांसाठी आसनव्यवस्था आहे. त्या व्यतिरिक्त महापालिका कर्मचारी, पत्रकार यांना उभे राहता येईल, अशी काही प्रमाणात जागा आहे. मात्र ही जागा अपुरी पडत असल्याने नवे सभागृह बांधण्याची मागणी विविध राजकीय पक्षांनी केली.





मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील जिमखान्याच्या जागेत नवे सभागृह असावे, यासाठी भाजप आग्रही आहे. या जागी टाऊनहॉल, जिमखान्याचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला होता. हा प्रस्ताव स्थायी समितीने नुकताच फेटाळला. त्यामुळे जिमखान्याच्या जागेवर सभागृह उभारणीचा मार्ग मोकळाही झाला. आता सुधारित आराखडा तयार करून नवीन सभागृह उभारणीचे नियोजन मुंबई महापालिकेने केले आहे. यामध्ये जिमखानाही असेल. सध्याचे सभागृह आतून साधारण ५० फूट उंच आहे. नवीन सभागृहाची आतून उंची ३० ते ४० फूट असेल. हा प्रस्ताव तयार करून त्याची लवकरच स्थायी समितीकडून मंजुरी घेतली जाणार आहे.



नवीन सभागृहात काय?


नवीन सभागृह चार मजली असेल. खाली क्रीडासंकुल, त्यावर पार्किंग व्यवस्था.त्यावरील मजल्यावर नगरसेवक, आयुक्त, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेत्यांचे चेंबर.सर्वांत वर सभागृह असेल. यामध्ये नगरसेवक, अधिकारी व पत्रकार बसू शकतील अशी व्यवस्था.८० वाहनांसाठी पार्किंगची जागा असेल.जुन्या महापालिका इमारतीतून नव्या सभागृहाच्या
"> इमारतीत जाण्यासाठी पुलाची जोडसत्ताधारी, विरोधकांसाठी स्वतंत्र लिफ्ट, जिने नवीन सभागृहात महापौर, सत्ताधारी, विरोधक आणि सामान्यांसाठी चार लिफ्ट असतील, तर दोन जिने असतील. यामध्ये एक सत्ताधारी व विरोधकांसाठी असेल, अशी माहिती खणकर यांनी दिली. महापौरांना बैठकांसाठी स्वतंत्र दालन नाही. त्यामुळे त्यांच्या बैठका स्थायी समिती किंवा सुधार समितीच्या सभागृहात होत आहेत, ते म्हणाले.


"मुंबई महापालिका नवीन सभागृह उभारणार पूर्वी टाऊनहॉल उभारणीसाठी निविदा काढण्यात आली होती. त्यात सुधारणा करून याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. त्याची स्थायी समितीत मंजुरी घ्यावी लागणार आहे. नवीन सभागृहाचा आराखडाही तयार झाला असून हे सभागृह आताच्या सभागृहासारखेच वारसास्थळासारखे असेल."- डॉ. अविनाश ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका


"सध्याच्या ऐतिहासिक 66 सभागृहातील जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे नवीन सभागृह असावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नवीन सभागृहाचा नकाशा, आराखडा तयार झाला आहे. महिनाभरात यावर अंतिन निर्णय होईल आणि ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भूमिपूजन केले जाईल."- गणेश खणकर, सभागृह नेते, मुंबई महापालिका

Tags
mumbai municipal corporationMumbai NewsbmcCivic InfrastructureNew Assembly HallMumbai Civic Body
Comments
Add Comment

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी

Air quality monitoring : मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई  : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

मुंबईत मोहरम मिरवणुकीत १४,९०० विषारी कॅप्सूल जप्त ! ३००० हजार लोकांचे जीव होते धोक्यात ?

Mumbai: मुंबईच्या भायखळा (Byculla) परिसर

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मध्ये रेल्वे मार्गावर १२ नवीन एसी लोकल धावणार; वेळपत्रक आले समोर

Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान एसी लोकलच्या

TET Paper Leak : भिवंडीत दीड कोटींना विकला जात होता टीईटीचा पेपर! पोलिसांच्या 'SIT'कडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुंबई : राज्यातील लाखो तरुण-तरुणींच्या भविष्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटचा ठाणे

महापालिकेच्यावतीने पाणी आणि अन्नाची शुद्धता तपासणी

अहवाल आता व्हॉट्सअॅप, ईमेलवर प्राप्त होणार मुंबई : पाणी आणि अन्न हे आपल्या रोजच्या जगण्यातील अविभाज्य घटक आहेत.