Road Development : ३० ते ४० मिनिटांचा प्रवास आता अवघ्या १५ मिनिटात होणार; कल्याण, शिळफाटा

मुंबई : मुंबईतीळ अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. मात्र आता कल्याण मधील शिळफाटा परिसरातून दररोज जे जीवघेण्या ट्रॅफिक मधून प्रवास करणाऱ्याना आता मोठा दिलासा मिळणार आहे. कल्याण शिळफाट्यावरील प्रवास मात्र आता अवघ्या १५ मिनिटात होणार आहे. ज्याप्रवासाला आधी ३० ते ४० मिनिटे लागायची तो आता काही मिनिटात होणारअसल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदच वातावरण आहे. परिसरातील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा लवकरच पूर्णत्वास येणार आहे.



फक्त कल्याण मध्येच नाही तर आणखी काही ठिकाणी

नवी मुंबई मधील ऐरोली- काटई(Airoli-Katai) नाका उन्नत मार्ग प्रकल्पाचे पहिला आणि दुसरा टप्पा हा अंतिम टप्प्यात आलेला असून लवकरच हे वाहतुकीसाठी सुरु करण्यात येणार आहेत असे एमएमआरडीएने सांगितले आहे. यामुळे नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि आसपासच्या भागातील वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Airoli Katai Naka Elevated Road Update | ऐरोली-काटई नाका मार्ग सप्टेंबरमध्ये होणार सुरू

साधारण 12.71 किलोमीटर लांबीचा या उन्नत मार्ग खरं तर मुंबई महानगरातील महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक मानला जातोय. हा मार्ग सुरु होताच ऐरोली ते डोंबिवली दरम्यानचे अंतर 10 किलोमीटरने कमी होईल. महत्त्वाचे म्हणजे 30 ते 45 मिनिटांचा प्रवासाचा वेळ वाचून तो नवी मुंबई ते डोंबिवली शहर(Navi Mumbai to Dombivli) हे अंतर फक्त 15 मिनिटांत पार करता येणार आहे. या प्रकल्पातील ठाणे-बेलापूर रोड ते राष्ट्रीय महामार्ग(Thane-Belapur Road to National Highway) 4 या 3.45 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे अधिक काम 92 टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे तर दुसरीकडे ऐरोली ते ठाणे-बेलापूर रोड 2.57 किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे कामही पूर्ण झालेले आहे.

Thane Belapur Highway Drone View Stock Footage Video (100% Royalty-free) 1104438579 | Shutterstock

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे(Dr. Shrikant Shinde) यांनी या महत्त्वाच्या प्रकल्पाला गती मिळावी म्हणून सातत्याने जात पाठपुरावाही केला होता. शिवाय अनेक वेळा याबाबत बैठका, प्रत्यक्ष जात पाहणी शिवाय संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या होता. त्यामुळे या प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्यात यश आले. या दोन्ही टप्प्यांचे उद्घाटन हे जुलै महिन्यात एकाच वेळी करुन वाहतूकीसाठी खुले करण्याचा विचार सुरु आहे. हा मार्ग सुरु होताच महापे, शिळफाटा, कल्याण फाटा, ठाणे-बेलापूर या सर्व मार्गावरील वाहतूक वेगवान होईल.
Comments
Add Comment

Pratik Karpe : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा; नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी

मुंबई : भविष्यात उद्भवणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगच्या (जागतिक तापमानवाढ) गंभीर धोक्याचा आणि वातावरणीय बदलांचा सामना

Jumbo Block : पश्चिम रेल्वेचा हार्बर मार्गावर जम्बो ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवार ९ ऑगस्ट २०२६ रोजी जम्बो ब्लॉक आहे. प्रवाशांनी या जम्बो ब्लॉकची

Sunil Tatkare : प्रशांत किशोर यांना राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार नेमल्याची माहिती माझ्यापर्यंत नाही; प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे

पक्षात दोन मतप्रवाह असल्याची चर्चा गैरवाजवी https://prahaar.in/2026/08/07/ahilyanagar-crime-news-case-registered-against-the-supervisors-son/ मुंबई : प्रसिद्ध राजकीय

Ahilyanagar Crime News : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार, मुकादमाच्या मुलावर गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील एका गावातील

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेची नवी इनिंग! निवृत्तीनंतर कोचिंग नाही, कॉमेंट्री नाही; आता करणार 'हे' मोठं काम

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा लाडका आणि अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत

Kiren Rijiju Statement on Amit Shah : 'ज्या दिवशी अमित शाह उत्तर देतील, ते तुम्हाला ऐकताही येणार नाही!' किरेन रिजिजूंचा विरोधकांवर हल्लाबोल

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या जोरदार गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही