Nashik : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्याचे २९ला होणार प्रस्थान, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आषाढी एकादशी पायी वारी

Nashik : विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आषाढी एकादशी पायी वारी पालखी सोहळ्याचे येत्या सोमवारी (दि. २९) श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. वारी सोहळ्यासाठी अवघी त्र्यंबक नगरी सज्ज झाली असून, लाखो वारकरी या आनंदवारीच्या भक्तिरसात चिंब होण्यासाठी आतुर झाले आहेत. संत ज्ञानेश्वर माऊलींचे गुरू आणि वडील बंधू असलेल्या निवृत्तीनाथदादांनी वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. समस्त संत मांदियाळींनी त्यात मोठी वृद्धी केली.



२८ दिवसांचा सोहळा


निवृत्तीनाथदादांनी मुहूर्तमेढ केलेला वारकरी संप्रदाय अवघ्या भारतवर्षात आहे. दर आषाढी एकादशीला निवृत्तीनाथदादांचा पायी वारी पालखी सोहळा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून बा विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करीत असतो. या पायी वारी सोहळ्याला प्राचीन अखंडित अशी उज्ज्वल परंपरा आहे. हजारो वारकरी, वीणेकरी, टाळकरी, भालदार, चोपदार, भजनी मंडळ, कीर्तनकार, तुळशीधारी महिला, मानकरी आणि शेकडो दिंड्यासह हा पायी वारी सोहळा प्रस्थान करतो. दि. २९ जून ते २५ जुलै असा हा २८ दिवसांचा सोहळा चालणार आहे.


त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान झालेला हा पालखी सोहळा महानिर्वाणी आखाडा पेगलवाडी, सातपूर, गणेशवाडी पंचवटी, पळसे, लोणारवाडी, खंबाळे, पारेगाव, गोगलगाव, राजुरी, बेलापूर बु., राहुरी, डोंगरगण, अहिल्यानगर, अहिल्यानगर, साकत, घोगरगाव, मिरजगव, कर्जत, कोरेगाव, रावगाव, कंदर, दगडी अकोले, करकंब, चिंचोली (श्री चंद्रभागा स्नान) आणि शेवटी श्रीक्षेत्र पंढरपूर याप्रमाणे हा पालखी सोहळा पायी प्रवास करीत पांडुरंगाच्या चरणांचे दर्शन घेऊन पुलकित होतो.



पालखी सोहळ्याचे २९ जूनला होणार प्रस्थान


गेल्या सात आठ वर्षांपासून निवृत्तीनाथदादांची पालखी संपूर्ण चांदीच्या पत्र्याने बनविलेल्या रथात विराजमान केली जाते. या रथाला मानाची बैलजोडी जुंपत हा रथ ओढला जातो. रथाच्या सर्वात पुढे नगारा गाडी, त्यानंतर रथाच्या पुढे आणि मागे विणेकरी, टाळकरी, भजनी मंडळ, दिंड्या आणि हजारोंच्या संख्येने वारकरी निवृत्तीनाथांचा गजर करीत विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने चालत असतात. दि. २९ रोजी दुपारी २ वाजता हा सोहळा समाधी मंदिरापासून प्रस्थान करेल. यावेळी मंत्रिगण, लोकप्रतिनिधी, आमदार-खासदार, विश्वस्त मंडळ, मानकरी, कीर्तनकार, भजनी मंडळ, महाराज, साधू-संत, विणेकरी, वारकरी आदींसह लाखोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती राहणार आहे.


सर्वांनी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथदादांच्या आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन निवृत्तीनाथ समाधी मंदिर संस्थानचे अध्यक्ष हभप राहुल महाराज साळुंखे, सचिव श्रीपाद कुलकर्णी, पालखी सोहळाप्रमुख मनोजकुमार राठी विश्वस्त नारायण मुठाळ, प्रा. अमर ठोंबरे, कांचन जगताप, नीलेश गाढवे, अड. सोमनाथ घोटेकर, गोकुळ गांगुर्डे, भानुदास गोसावी, जयंत गोसावी, योगेश गोसावी आणि त्र्यंबकेश्वरचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Nashik : रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना १० दिवसांत दिलासा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हस्तक्षेप; अंतिम निर्णयासाठी उच्चस्तरीय बैठक

Nashik : नाशिक रिंग रोडच्या अलाइनमेंट व भूसंपादनाच्या (Ring Road alignment and land acquisition) प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister

Nashik : रस्ते दुरुस्तीसाठी दिवस-रात्र यंत्रणा कार्यरत ठेवा, महापौर हिमगौरी आहेर-आडके यांचे निर्देश

Nashik : नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने (Nashik Municipal Corporation)

Devendra Fadnavis : कलम ३७० हटवण्याचा निर्णय म्हणजे 'एक भारत, श्रेष्ठ भारत'च्या संकल्पनेला बळ; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले पंतप्रधान मोदी व अमित शाह यांना अभिवादन

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० (Article 370) आणि ३५A रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला सात वर्षे पूर्ण होत असताना

Central Railway : पुरुषांनो लक्ष द्या! महिलांच्या डब्यात पाय ठेवला तर दंड अन् थेट... मध्य रेल्वेचा मोठा निर्णय!

मुंबई : रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी मध्य

Jalgaon : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! १२ ऑगस्टला 'या' गाड्या रद्द, अनेकांचा मार्ग बदलला

Jalgaon : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भादली–जळगाव दरम्यान पाचव्या रेल्वे मार्गाच्या कामाला वेग देण्यात आला

Government Hospital Catering Services : सरकारी रुग्णालयांतील खानपान सेवा आता महिला बचत गटांकडे

- २०० पेक्षा कमी खाटांच्या रूग्णालयांसाठी निर्णय; पारदर्शक गुणांकनाद्वारे जिल्हा स्तरावर निवड होणार मुंबई :