Nashik : विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आषाढी एकादशी पायी वारी पालखी सोहळ्याचे येत्या सोमवारी (दि. २९) श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. वारी सोहळ्यासाठी अवघी त्र्यंबक नगरी सज्ज झाली असून, लाखो वारकरी या आनंदवारीच्या भक्तिरसात चिंब होण्यासाठी आतुर झाले आहेत. संत ज्ञानेश्वर माऊलींचे गुरू आणि वडील बंधू असलेल्या निवृत्तीनाथदादांनी वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. समस्त संत मांदियाळींनी त्यात मोठी वृद्धी केली.
Nashik : राज्यातील पोलिस प्रशासनातील (Police Administration) महत्त्वाच्या बदल्यांचा मार्ग अखेर मोकळा झाला असून अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या सहायक पोलिस ...
२८ दिवसांचा सोहळा
निवृत्तीनाथदादांनी मुहूर्तमेढ केलेला वारकरी संप्रदाय अवघ्या भारतवर्षात आहे. दर आषाढी एकादशीला निवृत्तीनाथदादांचा पायी वारी पालखी सोहळा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून बा विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करीत असतो. या पायी वारी सोहळ्याला प्राचीन अखंडित अशी उज्ज्वल परंपरा आहे. हजारो वारकरी, वीणेकरी, टाळकरी, भालदार, चोपदार, भजनी मंडळ, कीर्तनकार, तुळशीधारी महिला, मानकरी आणि शेकडो दिंड्यासह हा पायी वारी सोहळा प्रस्थान करतो. दि. २९ जून ते २५ जुलै असा हा २८ दिवसांचा सोहळा चालणार आहे.
त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान झालेला हा पालखी सोहळा महानिर्वाणी आखाडा पेगलवाडी, सातपूर, गणेशवाडी पंचवटी, पळसे, लोणारवाडी, खंबाळे, पारेगाव, गोगलगाव, राजुरी, बेलापूर बु., राहुरी, डोंगरगण, अहिल्यानगर, अहिल्यानगर, साकत, घोगरगाव, मिरजगव, कर्जत, कोरेगाव, रावगाव, कंदर, दगडी अकोले, करकंब, चिंचोली (श्री चंद्रभागा स्नान) आणि शेवटी श्रीक्षेत्र पंढरपूर याप्रमाणे हा पालखी सोहळा पायी प्रवास करीत पांडुरंगाच्या चरणांचे दर्शन घेऊन पुलकित होतो.
मुंबई: महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ७.६९ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२६ अदत्त शिल्लक रकमेची २६ जुलै २०२६ पर्यंत देय ...
पालखी सोहळ्याचे २९ जूनला होणार प्रस्थान
गेल्या सात आठ वर्षांपासून निवृत्तीनाथदादांची पालखी संपूर्ण चांदीच्या पत्र्याने बनविलेल्या रथात विराजमान केली जाते. या रथाला मानाची बैलजोडी जुंपत हा रथ ओढला जातो. रथाच्या सर्वात पुढे नगारा गाडी, त्यानंतर रथाच्या पुढे आणि मागे विणेकरी, टाळकरी, भजनी मंडळ, दिंड्या आणि हजारोंच्या संख्येने वारकरी निवृत्तीनाथांचा गजर करीत विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने चालत असतात. दि. २९ रोजी दुपारी २ वाजता हा सोहळा समाधी मंदिरापासून प्रस्थान करेल. यावेळी मंत्रिगण, लोकप्रतिनिधी, आमदार-खासदार, विश्वस्त मंडळ, मानकरी, कीर्तनकार, भजनी मंडळ, महाराज, साधू-संत, विणेकरी, वारकरी आदींसह लाखोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती राहणार आहे.
सर्वांनी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथदादांच्या आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन निवृत्तीनाथ समाधी मंदिर संस्थानचे अध्यक्ष हभप राहुल महाराज साळुंखे, सचिव श्रीपाद कुलकर्णी, पालखी सोहळाप्रमुख मनोजकुमार राठी विश्वस्त नारायण मुठाळ, प्रा. अमर ठोंबरे, कांचन जगताप, नीलेश गाढवे, अड. सोमनाथ घोटेकर, गोकुळ गांगुर्डे, भानुदास गोसावी, जयंत गोसावी, योगेश गोसावी आणि त्र्यंबकेश्वरचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी केले आहे.