Nashik : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्याचे २९ला होणार प्रस्थान, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आषाढी एकादशी पायी वारी

Nashik : विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आषाढी एकादशी पायी वारी पालखी सोहळ्याचे येत्या सोमवारी (दि. २९) श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. वारी सोहळ्यासाठी अवघी त्र्यंबक नगरी सज्ज झाली असून, लाखो वारकरी या आनंदवारीच्या भक्तिरसात चिंब होण्यासाठी आतुर झाले आहेत. संत ज्ञानेश्वर माऊलींचे गुरू आणि वडील बंधू असलेल्या निवृत्तीनाथदादांनी वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. समस्त संत मांदियाळींनी त्यात मोठी वृद्धी केली.



२८ दिवसांचा सोहळा


निवृत्तीनाथदादांनी मुहूर्तमेढ केलेला वारकरी संप्रदाय अवघ्या भारतवर्षात आहे. दर आषाढी एकादशीला निवृत्तीनाथदादांचा पायी वारी पालखी सोहळा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून बा विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करीत असतो. या पायी वारी सोहळ्याला प्राचीन अखंडित अशी उज्ज्वल परंपरा आहे. हजारो वारकरी, वीणेकरी, टाळकरी, भालदार, चोपदार, भजनी मंडळ, कीर्तनकार, तुळशीधारी महिला, मानकरी आणि शेकडो दिंड्यासह हा पायी वारी सोहळा प्रस्थान करतो. दि. २९ जून ते २५ जुलै असा हा २८ दिवसांचा सोहळा चालणार आहे.


त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान झालेला हा पालखी सोहळा महानिर्वाणी आखाडा पेगलवाडी, सातपूर, गणेशवाडी पंचवटी, पळसे, लोणारवाडी, खंबाळे, पारेगाव, गोगलगाव, राजुरी, बेलापूर बु., राहुरी, डोंगरगण, अहिल्यानगर, अहिल्यानगर, साकत, घोगरगाव, मिरजगव, कर्जत, कोरेगाव, रावगाव, कंदर, दगडी अकोले, करकंब, चिंचोली (श्री चंद्रभागा स्नान) आणि शेवटी श्रीक्षेत्र पंढरपूर याप्रमाणे हा पालखी सोहळा पायी प्रवास करीत पांडुरंगाच्या चरणांचे दर्शन घेऊन पुलकित होतो.



पालखी सोहळ्याचे २९ जूनला होणार प्रस्थान


गेल्या सात आठ वर्षांपासून निवृत्तीनाथदादांची पालखी संपूर्ण चांदीच्या पत्र्याने बनविलेल्या रथात विराजमान केली जाते. या रथाला मानाची बैलजोडी जुंपत हा रथ ओढला जातो. रथाच्या सर्वात पुढे नगारा गाडी, त्यानंतर रथाच्या पुढे आणि मागे विणेकरी, टाळकरी, भजनी मंडळ, दिंड्या आणि हजारोंच्या संख्येने वारकरी निवृत्तीनाथांचा गजर करीत विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने चालत असतात. दि. २९ रोजी दुपारी २ वाजता हा सोहळा समाधी मंदिरापासून प्रस्थान करेल. यावेळी मंत्रिगण, लोकप्रतिनिधी, आमदार-खासदार, विश्वस्त मंडळ, मानकरी, कीर्तनकार, भजनी मंडळ, महाराज, साधू-संत, विणेकरी, वारकरी आदींसह लाखोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती राहणार आहे.


सर्वांनी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथदादांच्या आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन निवृत्तीनाथ समाधी मंदिर संस्थानचे अध्यक्ष हभप राहुल महाराज साळुंखे, सचिव श्रीपाद कुलकर्णी, पालखी सोहळाप्रमुख मनोजकुमार राठी विश्वस्त नारायण मुठाळ, प्रा. अमर ठोंबरे, कांचन जगताप, नीलेश गाढवे, अड. सोमनाथ घोटेकर, गोकुळ गांगुर्डे, भानुदास गोसावी, जयंत गोसावी, योगेश गोसावी आणि त्र्यंबकेश्वरचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Mumbai Local Train Crime : लोकलमधील किरकोळ वादाचं भीषण रूप; मध्यरात्री घडली धक्कादायक घटना

मुंबई : मुंबईच्या (Mumbai) लोकल ट्रेनमध्ये (Local Train) पुन्हा एकदा धक्कादायक गुन्ह्याची (Crime) घटना समोर आली आहे. मध्यरात्री

Devendra Fadnavis : सुमार कामगिरी करणाऱ्यांना मुख्यमंत्री देणार नारळ?

- मंत्रिमंडळात फेरबदलांचे संकेत; चांगले काम करणाऱ्या मंत्र्यांचे 'प्रमोशन' मुंबई : महायुती सरकारमध्ये सुमार

Chandrashekhar Bawankule : ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’साठी ९१ विधानसभा मतदारसंघांत 'सह अध्यक्षां'ची नेमणूक; महसूलमंत्री बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’च्या

Narendra Modi : सीईटीए' करारामुळे शेतकरी, उद्योजक आणि एमएसएमईंना नवी गती : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील 'सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार' आणि ऐतिहासिक 'सामाजिक

Jaykumar Gore : सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याला यश

सोलापूर : सोलापूर विमानतळावरून २८ जून पासून बंद असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवा स्टार एअरलाईन कंपनीकडून २

PoK : पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात PoK मध्ये 12 नागरिकांचा मृत्यू

मुझफ्फराबाद : पाकिस्तानव्याप्त काश्मीर (POK)मध्ये सरकारविरोधी आंदोलन अधिक तीव्र झाले असून, मंगळवारी आंदोलक आणि